Monday, September 29, 2025

देशी खेळ - आनंद, आरोग्य ,संस्कार

 


क्रीडाया परिहार : साक्षात स्वास्थ्यम

यथा s द्वयं जगत्येव व्यायामः क्रीडितः सदा ॥

या संस्कृत सुभाषितामधील अर्थानुसार खेळ आणि व्यायाम यांच्यामुळेच आपल्याला निरोगी आरोग्य लाभते .नियमित केल्यामुळे आपले शरीर आणि मन दोन्ही मजबूत होतात आपल्या भारत देशात खेळ आणि त्या खेळांचा स्वतःचा इतिहास आहे तो प्राचीन काळात देशाचा अविभाज्य भाग होता रामायण महाभारत यामध्ये पुरावे दाखवतात की शिकार करणे, पोहणे, नौका विहार,वजन उचलणे ,कुस्ती, धनुर्विद्या,घोडे स्वारी असे अनेक खेळ खेळले जात होते.फासे गोळे यांचा वापर खेळण्यासाठी केला जात होता.आजही आपण बघतो भारताच्या विविध राज्यांमध्ये विविध खेळ खेळले जातात.आपल्याला कोणकोणते देशी खेळ आहेत याची सध्या माहिती सुद्धा नाही.आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२०मध्ये देशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे याच संदर्भात माझे भोपाळ या ठिकाणी देशी खेळ आणि योग यांचे पाच दिवशीय प्रशिक्षण झाले विविध राज्यातील विविध देशी खेळांची माहिती त्या ठिकाणी मिळाली प्रत्येक राज्यातील देशी खेळ आपल्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावेत आणि आपले देशी खेळ इतर राज्यातील विद्यार्थ्यांना शिकता आले पाहिजेत याच कल्पनेतून "देशी खेळातून साधूया राष्ट्रीय एकात्मता" या उपक्रमाला मी माझ्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी सुरुवात केली.

उपक्रमाची उद्दिष्टे-

१) देशी खेळांविषयी आवड निर्माण करणे .

२)राष्ट्रीय एकात्मता मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे .

३ ) एकमेकांच्या आचार ,विचार यांची देवाणघेवाण करणे .

४ ) विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास करणे .

५) भारतातील इतर राज्यातील विद्यार्थ्यांची सुसंवाद करून संस्कृती, खेळ ,परंपरा यांची माहिती घेणे .

उपक्रमाच्या तयारीला सुरुवात-

सी सी आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात गुवाहाटी येथे अनेक राज्यातील शिक्षकांशी माझा संपर्क आला होता .या उपक्रमासाठी प्राथमिक स्वरूपात प्रथमतः हरियाणा आणि पश्चिम बंगाल येथील शिक्षकांशी संपर्क करून माझ्या उपक्रमाविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली .त्यांनाही हा उपक्रम खूप आवडला .आपल्या राज्यातील खेडेगावांमध्ये जी मुले खेळ खेळतात अशा खेळांची यादी तयार करण्यात आली .महाराष्ट्रातील लंगडी, लगोरी ,गोट्या तसेच हरियाणातील काली हंडी चरभर कटी पतंग आणि पश्चिम बंगालमधील पत्ता पत्ता, डांगुली ,घाणी, घुरी उडाना अशा खेळांची आपापसात देवाणघेवाण करण्याचे ठरवले या उपक्रमासाठी मोबाईल आणि संगणकाचा वापर करावयाचे ठरवण्यात आले.

आनंददायी शनिवारचा योग्य वापर-

आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत या उपक्रमासाठी वेळेचे नियोजन करण्यात आले .शनिवारच्या सकाळच्या वेळेत मुले आनंदाने मोबाईलच्या व्हिडिओ कॉल चा वापर करून देशी खेळ शिकू लागली प्रथमतः सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रातील लंगडी लगोरी गोट्या हे देशी खेळ हरियाणा व पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांना शिकवू लागले .हे खेळ कसे खेळले जातात याचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून त्यांना पाठवण्यात आले .छोट्या मुलांना तर खेळ फार आवडतात नियोजनाप्रमाणे आमच्या मुलांनी हरियाणा पश्चिम बंगालमधील देशी खेळ अशाच प्रकारे शिकून घेतले .स्थानिक परिस्थितीनुसार थोडा नियोजनात बदल करून घ्यावा लागला हरियाणा पश्चिम बंगालमधील शाळांची या उपक्रमासाठी पूर्व परवानगी घेण्यात आली आमची शाळा दुर्गम भागात असल्यामुळे कधी कधी मोबाईलचा नेटवर्कचा प्रश्न निर्माण झाला .अशा वेळेस शाळेच्या गावच्या मंदिरात जाऊन आम्ही हा उपक्रम घेतला .

विद्यार्थी देशी खेळ खेळू लागले-

मोबाईल संगणकाच्या युगात आपणच आपली संस्कृती परंपरांचा, हे सगळं विसरत चाललो आहोत.लहानपणी आपण खेळत असलेले खेळ आता कुठेतरी हरवल्यासारखे झाले आहेत असे वाटते .म्हणूनच भोपाळ येथे झालेल्या देशी खेळांच्या प्रशिक्षणानंतर आपणही देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी काहीतरी करायचं असं ठरवलं आणि हा उपक्रम शाळेत इतर राज्यातील: शिक्षकांच्या मदतीने सुरू केला.देशी खेळ खेळणं आत्ताच्या युगात कमी दर्जाचे मानले जाते.पण आता हेच देशी खेळ आपल्या मुलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत.हे पालकांना आणि शिक्षकांना समजू लागले.परिसरातील उपलब्ध साधनांचा वापर करून हे देशी खेळ खेळले जातात . यामुळे या खेळांना जास्त खर्च करावा लागत नाही .सुरुवातीला मुलांना या खेळांची सर्व विस्तृत माहिती करून दिली .मुलांना आपले देशी खेळ खूप आवडू लागले . इतर राज्यातील मुलांशी बोलताना अनेक भाषिक अडचणी निर्माण झाल्या .सर्व मुलांनी या अडचणींवर मात केली .देशी खेळांबरोबर एकमेकांच्या भाषेतील काही शब्दही मुले शिकले .मुले एकमेकांशी छान सुसंवाद करू लागली .मुलांना इतर राज्यातील ही देशी खेळ खूप आवडू लागले .पश्चिम बंगालमध्ये पतंगाला घरी असे बोलले जाते तसेच विठू दांडू ला तिथे डांगुली असे म्हटले जाते .महाराष्ट्रातील गोट्या खेळणे याला कंचे म्हटले जाते लगोरी या खेळाला सतोलिया म्हटले जाते .

असे अनेक शब्द मुलांना समजले व्हिडिओ कॉलिंग रेकॉर्डिंग या ऑनलाइन माध्यमातून आम्ही खेळाच्या निमित्ताने विविध राज्यातील विविध विद्यार्थ्यांची छान सुसंवाद करून लागले .शिक्षकांनी खेळाची पार्श्वभूमी नियम व घेण्याच्या पद्धती स्पष्ट केल्या .आमच्या शाळेतील मुलांनी बाल आनंद मिळाव्यात या सर्व देशी खेळांचे सादरीकरण केले आपण खेळांसोबत त्या राज्याची संस्कृती ,भाषा ,पोशाख, पारंपरिक खाद्यपदार्थ यांचा समावेश करून सर्वांगीण अनुभव देता येईल याचेही पूर्व नियोजन करून ठेवले आहे .या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य विविध संस्कृतीबद्दल आदर आणि भारतीय पारंपरिक क्रीडांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

खेळातून मैत्री, मैत्रीतून एकता –🇮🇳🤝

 देशी खेळांना लाभले एकतेचे पंख 🌸🦚

सातारा जिल्हा परिषद सातारा

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण आणि PI Jam Foundation – उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मूलभूत संगणक आणि कोडींग’ प्रशिक्षण या उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण व प्रकल्प सादरीकरण सोहळा आज सातारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.


या सोहळ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिरामणेवाडी येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय शिक्षणाधिकारी नायकवडी साहेब, मुजावर मॅडम तसेच डायटचे अधिव्याख्याता फडतरे साहेब यांनी कौतुक केले.


स्क्रॅचमध्ये साकारलेले देशी खेळांचे महत्त्व ✨

विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्रोग्रामिंगद्वारे देशी खेळांचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रकल्प सादर केला. या वेगळ्या उपक्रमाची सर्वांनी वाहवा केली.

विशेष म्हणजे मुजावर मॅडम आणि फडतरे साहेब यांनी स्वतः खेळात सहभागी होऊन खेळाचा आनंद घेतला.

इतर राज्यातील देशी खेळही या उपक्रमात मांडण्यात आले आणि याच तंत्रज्ञानाचा वापर करून हे देशी खेळ इतर राज्यातील मुलांना तसेच त्यांचे खेळ आपल्या महाराष्ट्रातील मुलांना शिकवण्यात आले .यातून राष्ट्रीय एकात्मता साधण्यात आली म्हणूनच या उपक्रमाचे नाव दिले आहे देशी खेळांना लाभले एकतेचे पंख .


प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग 🙌

छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे हा उपक्रम घेण्यात आला त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित अनेक कॉलेज युवकांनी आणि शाळकरी मुलांनी या देशी खेळांबद्दल उत्सुकता दाखवली.

“बऱ्याच वर्षांनी खेळल्याचा अनुभव” काहींनी व्यक्त केला,यामुळे भूतकाळात बालपणीच्या आठवणीत ते पुन्हा गेले . मात्र आपण आजच्या मुलांना फक्त मोबाईल आणि संगणक यावरच्या गेमच्या आठवणी द्यायच्या का हा मनात विचार पुन्हा पुन्हा येतो ?

तर काही मुलांनी “हे खेळ प्रथमच पाहिले व खेळले” अशी प्रतिक्रिया दिली.

सोपे-सोपे खेळही त्यांनी आनंदाने खेळले. 

अभ्यासातील ताणतणावापेक्षा मुलांना खेळ अधिक आनंददायी वाटतात, त्यामुळे हा स्टॉल सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.खेळातून अभ्यास कसा करावा याचेही यातून गमक समजते .अनेक खेळांशी भाषिक गणितीय संवाद आपल्याला घडवून आणता येतो .भूमितीतील बऱ्याचशा संकल्पना यातून आपल्याला समजू शकतात हेही या उपक्रमातून समजून आले .देशी खेळांमुळे निसर्गाशी एक अनोखे नाते यामुळे निर्माण झाले .यासाठी वेगळे कोणतेच साहित्य खरेदी करण्याची गरज नाही निसर्गातील साहित्याचा वापर करून आपण हे खेळ खेळून आनंद घेऊ शकतो .


संगणकाच्या दुनियेतून देशी खेळांचा प्रचार 🌍


आज संगणक आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुलं देशी खेळ विसरत चालली आहेत. पण याच संगणकाचा उपयोग करून देशी खेळांचा प्रचार-प्रसार कसा करता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प होय.ब्लॉग ,युट्युब  यांसारख्या माध्यमातून हा उपक्रम फक्त सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता भारताबाहेरच्या अनेक लोकांनी  या उपक्रमाची माहिती घेतली .

म्हणूनच या उपक्रमाची यशस्वीता आणि इतरांना याची उपयोगिता समजण्यासाठी हा उपक्रम राज्य व देशपातळीवर घेण्यात येऊन अशा वेगवेगळ्या उपक्रमांना संधी उपलब्ध करून द्यावी ही आयोजकांना कळकळीची विनंती .हरवत चाललेले आपल्या देशी खेळ पुन्हा नव्याने गवसण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीचा ठेवा असाच जतन करण्यासाठी असे उपक्रम खूप उपयुक्त आहेत .


खरे शिल्पकार -🖋️📖

महेश सर, आदेश सर आणि अक्षय सर यांनीही या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.आज संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांची चाललेली धडपड वाखाणण्याजोगी  होती .



गौरव आणि सन्मान 🏆

या प्रशिक्षणात उत्तम कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमातील सर्वांचेच उपक्रम खूपच छान आणि मेंदूला चालना देणारे होते .सर्वांनाच असे उपक्रम करण्यासाठी शुभेच्छा .


संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम व नेटके नियोजन, आपुलकी आणि समन्वयामुळे हा शोकेस कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. 🎉💐 धन्यवाद .


सौ .अंजली शशिकांत गोडसे

उपशिक्षिका

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरामणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा

Mb .9403969482





















पुस्तक क्र १३ ६ बसवेश्वर

 



वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १३६

पुस्तकाचे नाव - भारतीय साहित्याचे निर्माते बसवेश्वर

लेखकाचे नाव - एच् . तिप्पेरुद्रस्वामी

प्रकाशन व आवृत्ती- साहित्य अकादमी प्रकाशन

पृष्ठे संख्या– 51

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ 40

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१ ३ ६|पुस्तक परिचय


भारतीय साहित्याचे निर्माते : महात्मा बसवेश्वर 

एच् . तिप्पेरुद्रस्वामी


भारतीय इतिहास, समाजजीवन आणि साहित्य यांची वाटचाल पाहिली, तर आपल्याला केवळ राजकारणाची गाथा दिसत नाही; तर अध्यात्म, तत्त्वज्ञान, समाजसुधारणा आणि मानवतेचे मूल्य यांनी घडवलेली असामान्य परंपरा दिसते. या परंपरेतील एक अत्यंत उज्ज्वल नाव म्हणजे महात्मा बसवेश्वर. कर्नाटकाच्या भूमीत १२व्या शतकात उदयास आलेला हा तेजस्वी महामानव केवळ संतच नव्हे, तर एक विचारवंत, कवी, सामाजिक क्रांतिकारक आणि मानवतावादी साहित्यनिर्माता होता.


"भारतीय साहित्याचे निर्माते : महात्मा बसवेश्वर" हे पुस्तक या महान संताचा सर्वांगीण परिचय करून देणारे, त्यांच्या वाङ्मयीन आणि सामाजिक कार्याची महती सांगणारे, तसेच त्यांच्या विचारधारेला आधुनिक परिप्रेक्ष्यात अधोरेखित करणारे एक महत्वाचे साहित्य आहे. या पुस्तकातून आपण बसवेश्वरांच्या बहुआयामी कार्याची, त्यांच्या कवितांची आणि मानवतावादी समाजदृष्टीची सखोल ओळख करून घेतो.


महात्मा बसवेश्वरांचे जीवनचरित्र


बसवेश्वरांचा जन्म इ.स. ११३४ मध्ये कर्नाटकातील बागेवाडी येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना धर्म, समाज आणि जीवनमूल्यांविषयी तीव्र कुतूहल होते. तत्कालीन समाजात जातिभेद, कर्मकांड, अस्पृश्यता आणि धार्मिक ढोंगीपणा यांचा अतिरेक होता. या परिस्थितीत बसवेश्वरांनी प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारला आणि एक नवी समाजव्यवस्था उभी करण्याचा संकल्प केला.


त्यांनी "अनुभव मंटप" ही एक अद्वितीय संस्था उभारली. इथे स्त्री-पुरुष, शूद्र-ब्राह्मण, गरिब-श्रीमंत, राजा-प्रजा असे भेद न ठेवता सर्वांना आपला विचार मांडण्याची संधी मिळाली. ही संस्था म्हणजे जगातील पहिली लोकशाहीवादी संसद मानली जाते.


साहित्यनिर्मिती : वचनकाव्य


बसवेश्वरांनी प्रचंड प्रमाणात साहित्यनिर्मिती केली. त्यांच्या लेखनाला "वचन" असे म्हणतात. वचन म्हणजे साध्या, थेट, प्रांजळ भाषेत लिहिलेले विचारमंथन. हे वचनकाव्य आजही लोकांच्या जिभेवर असून, त्यातून समाजसुधारणा आणि अध्यात्मिक चिंतनाचा संगम अनुभवायला मिळतो.


त्यांच्या कवितांमध्ये दांभिकतेविरुद्ध प्रखर निषेध आहे. त्यांनी मूर्तिपूजेपेक्षा कर्मपूजेला अधिक महत्त्व दिले. त्यांचा स्पष्ट संदेश होता :


देव शोधायचा असेल तर मंदिरात नव्हे, तर मनात शोधा.


समाज उभारायचा असेल तर भेदभाव नष्ट करा.


खरी पूजा म्हणजे श्रम, परिश्रम आणि प्रामाणिक जीवन.


बसवेश्वरांची सामाजिक क्रांती


बसवेश्वर हे केवळ संत नव्हते, तर ते आधुनिकतेचे प्रवर्तक होते.


जातिभेदविरोधी चळवळ : त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला. कुणीही लिंगायत पंथाचा अनुयायी होऊ शकतो, असा खुला दृष्टिकोन त्यांनी दिला.


स्त्री-पुरुष समानता : त्यांच्या काळात स्त्रियांना विचार मांडण्याचा अधिकार नव्हता; परंतु अनुभव मंटपात अनेक स्त्रीविचारवंत, काव्यनिर्माती सहभागी झाल्या.


श्रमाची पूजा : बसवेश्वर म्हणाले, "कायम श्रम करणारा हातच पवित्र आहे." श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणे ही त्यांची महान देणगी.


त्यांचे विचार खरोखरच गांधीजींच्या सर्वोदय चळवळीचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता चळवळीचे आणि जगभरातील मानवाधिकार चळवळीचे आधीचे बीज ठरले.


पुस्तकाची वैशिष्ट्ये


हे पुस्तक महात्मा बसवेश्वरांना केवळ धार्मिक किंवा अध्यात्मिक चौकटीत न पाहता, त्यांच्या साहित्यनिर्मिती, तत्त्वज्ञान, सामाजिक सुधारणा, आणि मानवतावादी दृष्टिकोन यांच्या संपूर्ण परिप्रेक्ष्यात मांडते.


१. इतिहासाचा धांडोळा – पुस्तकात १२व्या शतकातील कर्नाटकाची सामाजिक, राजकीय व धार्मिक पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे.

२. वचनसाहित्याचे विश्लेषण – बसवेश्वरांच्या निवडक वचनांचे सखोल विवेचन, त्यातील प्रतीकात्मकता व तत्त्वज्ञान सांगितले आहे.

३. समाजक्रांतीचा ठसा – अनुभव मंटपाची कार्यपद्धती, स्त्रियांचा सहभाग, समानतेचे तत्त्वज्ञान हे तपशीलवार मांडले आहे.

४. आधुनिक संदर्भ – बसवेश्वरांचे विचार आजच्या काळात कसे लागू पडतात, हे विशेष अधोरेखित केले आहे.

५. साहित्याची भाषा व शैली – साधी, सरळ आणि परिणामकारक शैलीत पुस्तक लिहिलेले आहे.


आधुनिक काळातील महात्मा बसवेश्वरांचे महत्त्व


आजही जातीयवाद, धार्मिक अंधश्रद्धा, असमानता आणि भेदभाव समाजात जाणवतात. अशा वेळी बसवेश्वरांचे विचार मार्गदर्शक ठरतात.


लोकशाहीच्या मुळाशी अनुभव मंटपाचे तत्त्व आहे.


मानवी हक्कांची कल्पना त्यांच्या समतावादी दृष्टिकोनात रुजलेली आहे.


आर्थिक न्यायासाठी श्रमाला दिलेले महत्त्व आजच्या रोजगार-केंद्रित समाजात उपयुक्त आहे.


स्त्री-पुरुष समानतेचा विचार स्त्रीशक्ती सशक्तीकरणात आजही अत्यावश्यक आहे.


म्हणूनच हे पुस्तक केवळ भूतकाळाचे चित्रण करत नाही, तर वर्तमानकाळाला दिशा देणारे आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारे आहे.


पुस्तकाचे योगदान


हे पुस्तक वाचकांसाठी अनेक दृष्टींनी उपयुक्त ठरते :


साहित्यप्रेमींना वचनसाहित्यातील सौंदर्याची जाण होते.


समाजशास्त्रज्ञांना बसवेश्वरांच्या सुधारक भूमिकेचा अभ्यास करता येतो.


धर्मतज्ज्ञांना त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा उलगडा होतो.


सर्वसामान्य वाचकांना समानता, बंधुता आणि मानवता यांचे धडे मिळतात.


निष्कर्ष


"भारतीय साहित्याचे निर्माते : महात्मा बसवेश्वर" हे पुस्तक म्हणजे एका अद्वितीय महामानवाचे चरित्र नव्हे तर मानवतेच्या मार्गावर टाकलेला प्रकाशदीप आहे.

त्यांच्या वचनांतून आलेली साधेपणा, प्रांजळपणा आणि क्रांतिकारक दृष्टिकोन आजही मनाला स्पर्श करतो.


महात्मा बसवेश्वरांचा वारसा हा भारतीय साहित्याचा, समाजाचा आणि मानवतेचा अभिमान आहे. हे पुस्तक त्या वारशाला उजाळा देणारे, वाचकांना नवे भान देणारे आणि परिवर्तनासाठी प्रेरणा देणारे ठरते.

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १३५ पंडिता रमाबाई

 



वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १३५

पुस्तकाचे नाव - पंडिता रमाबाई

लेखकाचे नाव - अनुपमा उजगरे

प्रकाशन व आवृत्ती- साहित्य अकादमी प्रकाशन

पृष्ठे संख्या– ७२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ४०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१ ३ ५|पुस्तक परिचय

पंडिता रमाबाई

लेखिका अनुपमा उजगरे

भारतीय स्त्री चळवळीच्या इतिहासात, स्त्रियांच्या शिक्षणक्रांतीच्या वाटचालीत, तसेच सामाजिक न्यायासाठी प्राणपणाने लढलेल्या अग्रणी व्यक्तींमध्ये पंडिता रमाबाई सरस्वतींचे नाव आजही आदरपूर्वक घेतले जाते. त्यांनी उभा केलेला संघर्ष, समाजासमोर ठेवलेले विचार आणि त्यांनी उभारलेल्या संस्था या सर्व गोष्टी भारतीय स्त्रीशक्तीला एक नवा मार्ग दाखवून गेल्या. अनुपमा उजगरे यांनी लिहिलेलं "भारतीय साहित्याचे निर्माते – पंडिता रमाबाई" हे पुस्तक या विलक्षण स्त्रीचे जीवन, कार्य आणि साहित्य यांचा वेध घेणारं एक मूल्यवान दस्तावेज आहे. साहित्य अकादमीसारख्या राष्ट्रीय संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केल्याने त्याला एक अधिकृत आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे पुस्तक वाचकांना पंडिता रमाबाईंच्या बाल्यावस्थेपासून त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंतच्या प्रवासाचा सखोल परिचय करून देतं. त्यात त्यांच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी, सामाजिक परिस्थिती, भारतीय स्त्रियांवरील अन्यायकारक बंधने, विधवांची दीनवस्था, स्त्रीशिक्षणावरील विरोध, तसेच त्या काळातील धार्मिक-सामाजिक संस्था यांचा संदर्भ दिलेला आहे. या पार्श्वभूमीत रमाबाईंचं धैर्य, चिकाटी, त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि अध्यात्माशी निगडित असलेली मानसिकता उलगडून दाखवली आहे.


लेखिका अनुपमा उजगरे यांनी पंडिता रमाबाईंच्या साहित्यकृतींवर विशेष भर दिला आहे. ‘हाय कास्ट हिंदू वूमन’ सारखं इंग्रजीत लिहिलेलं पुस्तक असो किंवा स्त्रियांना मार्गदर्शन करणारे भाषणसंग्रह असोत – रमाबाईंच्या लेखनातून तत्कालीन समाजाची वस्तुस्थिती आणि त्यातील सुधारण्याची तीव्र गरज प्रभावीपणे समोर येते.

पंडिता रमाबाई या केवळ समाजसुधारक नव्हत्या, तर त्या एक विदुषी, लेखिका, प्रवासी, अनुवादक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. संस्कृत पंडितांचा वारसा लाभलेल्या घराण्यात जन्म असूनही त्यांनी त्या परंपरेतील स्त्रियांवर लादलेल्या बंधनांना कधीही स्वीकारलं नाही. समाजाने विरोध केला, धार्मिक गटांनी निंदा केली, पण तरीही त्या आपल्या मार्गावर ठाम राहिल्या.


अनुपमा उजगरे यांनी या पुस्तकात रमाबाईंच्या जिज्ञासू वृत्तीला विशेष अधोरेखित केलं आहे. इंग्रजी, संस्कृत, मराठी या भाषांसोबतच ग्रीक आणि हिब्रू भाषा शिकून त्यांनी धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. एवढंच नव्हे तर पाश्चात्त्य देशांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणातील प्रगत विचार भारतात आणले.

रमाबाईंच्या लेखनातून सामाजिक इतिहासाचं वास्तव टिपलं गेलं आहे.


The High-Caste Hindu Woman या ग्रंथामध्ये त्यांनी हिंदू धर्मातील उच्चवर्णीय स्त्रियांवर होणारे अत्याचार, विधवांची शोकांतिका, बालविवाहाची भीषणता आणि अंधश्रद्धा याविरोधात प्रखर आवाज उठवला.


त्यांच्या लेखनशैलीत तर्कशुद्धता आणि संवेदनशीलता यांचा सुंदर मेळ आहे. त्या केवळ दोष मांडत नाहीत, तर समस्येवर उपायही सुचवतात.


त्यांनी स्त्री-शिक्षणाला धर्म, परंपरा किंवा संस्कार यापलीकडे नेऊन मानवी हक्क म्हणून अधोरेखित केलं.


लेखिका उजगरे यांनी रमाबाईंच्या लेखनातील विचारांची मांडणी करताना त्यांचा प्रभाव पुढच्या पिढ्यांवर कसा झाला, यावरही सखोल चर्चा केली आहे.

साहित्याबरोबरच रमाबाईंचं समाजकार्यही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांनी स्थापन केलेल्या *‘आर्य महिला समाजा’*तून विधवांना शिक्षण व स्वावलंबनाची दारे खुली केली. शारदा सदन या संस्थेतून त्यांनी असंख्य स्त्रियांना आश्रय, शिक्षण आणि आत्मविश्वास दिला.


त्या काळात स्त्रियांनी घराबाहेर पडून सामाजिक काम करणं ही कल्पनाही धाडसी होती, पण रमाबाईंच्या कार्याने समाजात परिवर्तनाची बीजे रोवली. याच कार्यामुळे त्यांना भारताबरोबरच परदेशातही मान मिळाला.

अनुपमा उजगरे यांनी हे चरित्र लिहिताना केवळ माहितीपुरतं वर्णन न करता ते एक सजीव आणि प्रेरणादायी कथन बनवलं आहे. त्यांच्या लेखनात संशोधनाची काटेकोरता आणि साहित्यिक रचनाशैलीचा मोहक संगम आहे. रमाबाईंच्या जीवनप्रसंगांना त्या इतक्या जिवंतपणे मांडतात की वाचक त्यांच्यासोबत प्रवास करतोय असं वाटतं.


भाषा सोपी, प्रवाही आणि मार्मिक आहे. तसेच वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारी वाक्यरचना हेही या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.

आजच्या काळातही स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या लढ्याला पूर्ण विराम लागलेला नाही. अशा वेळी पंडिता रमाबाईंचं कार्य आणि विचार पुन्हा एकदा स्मरणात आणणं आवश्यक आहे. हे पुस्तक केवळ चरित्र नाही, तर स्त्रीशक्तीच्या जागृतीचा दस्तऐवज आहे.


विद्यार्थी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी आणि स्त्री-अध्ययनात रस असणारे सर्वच वाचक या पुस्तकातून नवी प्रेरणा घेऊ शकतात.

"भारतीय साहित्याचे निर्माते – पंडिता रमाबाई" हे अनुपमा उजगरे लिखित आणि साहित्य अकादमी तर्फे प्रकाशित पुस्तक म्हणजे पंडिता रमाबाईंच्या जीवन आणि कार्याचं एक सखोल, सत्यनिष्ठ आणि प्रेरणादायी चित्र आहे. त्यांच्या साहित्यकृतींना जागतिक पातळीवर मिळालेली दखल, त्यांची सामाजिक दृष्टी, स्त्रीशिक्षणासाठीचं अविरत योगदान आणि अडचणींवर मात करून उभं राहिलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व यांचा मागोवा हे पुस्तक अत्यंत प्रभावी पद्धतीने घेऊन जातं.


भारतीय समाजाच्या परिवर्तनकथेतील या थोर स्त्रीचं स्मरण करून देणारं हे पुस्तक वाचकांना केवळ इतिहासाची माहिती देत नाही, तर वर्तमानातही विचार करण्यास भाग पाडतं. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतं.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र. १३३ पपेट्सची दुनिया

 


वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १३ ३

पुस्तकाचे नाव - पपेटची दुनिया

लेखकाचे नाव - सुषमा दातार

प्रकाशन व आवृत्ती- जयदीप प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या– ५९

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१ ३ ३|पुस्तक परिचय

पपेटची दुनिया

सुषमा दातार

बालपण म्हणजे कल्पनांचे इंद्रधनुष्य, निरागसतेचा झरा आणि आनंदाचा अथांग सागर. लहान मुलांना त्यांच्या भोवतालच्या जगाचा अनुभव घेण्यासाठी खेळणी, कार्टून, बाहुल्या, पपेट्स ही साधने सर्वात जवळची आणि आपुलकीची वाटतात. सी सी आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत गुवाहाटी येथे हे बाहुल्या बनवण्याचं सुंदर असं प्रशिक्षण मी पूर्ण केले .त्यामुळे या बाहुल्यांचं शिक्षण प्रक्रियेतलं महत्त्व मला चांगलंच अवगत झालं .बाहुल्यांचे हे विश्वच त्यांच्या कल्पनाशक्तीला रंग देत असते. त्यातूनच शिक्षण-प्रक्रियेला सोपी, रंजक आणि जिव्हाळ्याची दिशा मिळते. हाच विचार डोळ्यासमोर ठेवून लेखिका सुषमा दातार यांनी लिहिलेले “पपेटची दुनिया” हे पुस्तक बालशिक्षण, शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक प्रयोगांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

सुषमा दातार या प्रगल्भ शिक्षणतज्ज्ञ, सर्जनशील लेखिका आणि लहान मुलांच्या मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या विदुषी आहेत. शिक्षण-प्रक्रियेत नावीन्य आणणे, मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे आणि शिकवणीत आनंदाची जोड देणे हा त्यांचा जीवनदृष्टिकोन आहे. त्यांनी अनेक ठिकाणी शिक्षकांना प्रशिक्षण दिले असून, विशेषतः “पपेट थियेटर” किंवा “बाहुली नाट्य” या माध्यमातून शिक्षण अधिक जिवंत कसे होऊ शकते, हे त्यांनी अनुभवातून दाखवून दिले आहे.

“पपेटची दुनिया” हे पुस्तक त्यांच्या अशाच अनुभवांचा आणि प्रयोगांचा फलित आहे.

हे पुस्तक मुख्यत्वेकरून बाहुल्या, पपेट्स, त्यांच्या निर्मितीचे तंत्र, शालेय शिक्षणातील त्यांचा वापर आणि मुलांच्या मानसशास्त्राशी जोडलेला त्यांचा संबंध या सर्व विषयांवर प्रकाश टाकते.


पपेट्सची ओळख


पपेट म्हणजे काय, त्यांचे प्रकार, त्यामागचा इतिहास आणि भारतीय परंपरेतील बाहुल्यांचा वारसा याची माहिती पुस्तकात सुरुवातीला दिलेली आहे.


“काठपुतली” संस्कृती, देश-विदेशातील बाहुली नाट्याची परंपरा याचे सुंदर विवेचन आढळते.

पपेट्सचे प्रकार


फिंगर पपेट्स (बोटांवर बसवायचे लहान पपेट्स)


हॅण्ड पपेट्स (हाताच्या सहाय्याने चालवायची बाहुली)


रॉड पपेट्स (काठ्यांवर बसवलेली बाहुली)


शॅडो पपेट्स (पडद्यामागे प्रकाश टाकून तयार होणारी सावलीची कला)


सॉक पपेट्स (जुने मोजे, कपडे वापरून बनवलेली बाहुली)


या सर्व प्रकारांची सोपी ओळख, चित्रे आणि कृतींची माहिती पुस्तकात दिलेली आहे.

पपेट बनवण्याची कृती


मुलांना सहज करता येतील अशा साध्या साहित्यापासून (कागद, गोंद, जुन्या वस्तू, कपडे, मोजे, बाटल्या, काड्या) पपेट्स तयार करण्याच्या सोप्या कृती पुस्तकात आहेत.


पायरीपायरीने दिलेली माहिती, तसेच त्यासोबतचे रंगीत रेखाचित्रे आणि छायाचित्रे वाचकाला कृतीत सामील होण्यास प्रवृत्त करतात.


शिक्षणातील पपेट्सचा वापर


गणित, भाषा, पर्यावरण, सामाजिक शास्त्र या विविध विषयांत पपेट्सचा कसा उपयोग होऊ शकतो, याचे सुंदर उदाहरण दिलेले आहे.


उदाहरणार्थ, आकडेमोड शिकवताना पपेट्सचा वापर केल्यास मुलांना शिकणे खेळासारखे वाटते.


भाषा शिकवताना पपेट्स संवाद साधतात, गोष्टी सांगतात, गाणी म्हणतात – त्यामुळे मुलांचा उच्चार, शब्दसंग्रह आणि संवादकौशल्य आपोआप विकसित होते.

बालमानसाशी एकरूपता


पपेट्स हा केवळ खेळ नाही, तर मुलांशी नातं जोडण्याचा, त्यांच्या भावना समजून घेण्याचा मार्ग आहे, हे पुस्तक वाचताना जाणवते.


बाहुल्या मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात, त्यांना अभिव्यक्तीची संधी देतात.

शिक्षकांसाठी – हे पुस्तक शिक्षकांना शिक्षण अधिक आनंददायी करण्याचे प्रभावी साधन देते.

हे पुस्तक पुढील सर्वांना उपयुक्त आहे .

पालकांसाठी – घरात मुलांसोबत सर्जनशील वेळ घालवण्यासाठी उपयुक्त.


विद्यार्थ्यांसाठी – सर्जनशीलता, हस्तकला, गोष्टी सांगणे, अभिनय या सर्व गोष्टी एकाचवेळी शिकवणारे.


संशोधकांसाठी – बालशिक्षणातील पर्यायी प्रयोग समजून घेण्यासाठी उपयुक्त संदर्भग्रंथ.

लेखिका सुषमा दातार यांनी हे पुस्तक केवळ तांत्रिक मार्गदर्शक म्हणून नाही, तर बालशिक्षणाचा सखोल अभ्यास करून लिहिले आहे. वाचताना आपल्याला प्रत्यक्ष वर्गातल्या प्रसंगांची आठवण येते. पपेट्स मुलांना कसे खेचून घेतात, त्यांच्यात कुतूहल कसे निर्माण करतात आणि शिक्षण प्रक्रियेतील कंटाळवाणेपणा कसा नाहीसा करतात, हे जिवंत चित्र आपल्यासमोर उभे राहते.

“पपेटची दुनिया” हे पुस्तक मुलांच्या कल्पनारम्य जगाला समजून घेऊन ते शिक्षणाशी जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. बाहुल्या आणि पपेट्स या छोट्याशा साधनातूनही मुलांना विचार करायला, बोलायला, हसायला, शिकायला आणि सर्जनशील बनायला मदत होते. शिक्षणात वेगळेपणा आणू इच्छिणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने, शिक्षणशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी आणि मुलांवर प्रेम करणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.


हे पुस्तक म्हणजे बालशिक्षणाच्या विश्वातील एक रंगीत, आनंदी, सर्जनशील खिडकीच आहे. तेव्हा प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे आणि यातील बाहुली बनवण्याचा प्रयत्न करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचवावे .धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १३ २ संत नामदेव

 



वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १३२

पुस्तकाचे नाव - भारतीय साहित्याचे निर्माते नामदेव

लेखकाचे नाव - माधव गोपाळ देशमुख

प्रकाशन व आवृत्ती- साहित्य अकादमी नवी दिल्ली प्रकाशन

पृष्ठे संख्या– ५२

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ४०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१ ३ २|पुस्तक परिचय

भारतीय साहित्याची निर्माते

नामदेव 

माधव गोपाळ देशमुख

भारतीय सांस्कृतिक वारसा हा संत परंपरेने समृद्ध आहे. महाराष्ट्रातील संतांनी सामान्य जनतेच्या जीवनात भक्तीचे, नैतिकतेचे आणि सामाजिक समतेचे संदेश रुजवले. संत नामदेव हे या परंपरेतील अग्रगण्य नाव. त्यांच्या अभंगांनी लोकांना ईश्वरभक्तीचा तसेच जीवनदृष्टीचा नवा मार्ग दाखविला. माधव गोपाळ देशमुख लिखित “भारतीय साहित्याचे निर्माते संत नामदेव” हे पुस्तक या संतकवीचे जीवन, विचार आणि साहित्य यांचा अभ्यासपूर्ण परिचय घडवते.

लेखक माधव गोपाळ देशमुख हे साहित्याचे समर्पित अभ्यासक. मराठी संतसाहित्याचा गाढा अभ्यास करून त्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. त्यांच्या लेखनशैलीत भावनाशीलता आणि चिकित्सक विवेचन यांचा उत्तम संगम आहे. ते स्तुतीपर वर्णनात अडकून न राहता, विचारांचा व परिणामांचा सखोल शोध घेतात.

संत साहित्य हे वारकरी संप्रदायाचे आत्मा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव यांनी लोकमानसाला स्पर्श केला. यात नामदेव हे विशेष ठरतात कारण त्यांनी मराठीत रचना केल्या आणि त्याचबरोबर उत्तर भारतात जाऊन आपला संदेश पसरविला. त्यामुळे ते अखिल भारतीय संतकवी ठरले.

१२७० मध्ये नरसी-नामदेव (जि. नांदेड) येथे नामदेवांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांना विठ्ठलभक्तीचा संस्कार मिळाला. शिवणकामाचा व्यवसाय असलेल्या घरात वाढूनही त्यांची ओढ देवाच्या कीर्तनाकडेच होती. त्यांनी महाराष्ट्राबरोबर पंजाब, राजस्थान, दिल्ली, वाराणसी येथे प्रवास केला. लोकांशी थेट संवाद साधत भजन-कीर्तनाच्या परंपरेतून त्यांनी समाजप्रबोधन केले.

नामदेवांची भक्ती ही केवळ व्यक्तिगत भावनांत अडकलेली नव्हती. ती समाजाला परिवर्तन देणारी ठरली.


समानतेचा संदेश – देव हा सर्वांचा आहे, जात-पात महत्त्वाची नाही.


निर्गुण-सगुण संकल्पना – विठ्ठल हा भक्ताच्या अंतःकरणातील अनुभव आहे.


लोकशिक्षण – कीर्तन हे केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक जागृतीचे साधन आहे.

संत नामदेव हे अभंगाचे आद्य निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अभंगांमध्ये –


विठ्ठलावरील उत्कट प्रेम,


दैनंदिन जीवनातील साधेपणा,


अन्यायावरील कठोर टीका,


देवाशी थेट संवाद


हे सर्व दिसते. त्यांनी अभंगातून लोकांना ईश्वराची अनुभूती करून दिली. देशमुखांनी अनेक अभंगांचे संदर्भ देत त्यांच्या कलात्मकतेचे विवेचन केले आहे.

नामदेवांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या कीर्तनात उच्च-नीच भेद नव्हता. सर्वांनी एकत्र येऊन भजन करावे, हा त्यांचा आग्रह. समाजाला नैतिकतेची दिशा देण्याबरोबरच त्यांनी लोकांमध्ये एकोपा निर्माण केला.

नामदेवांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या रचना गुरुग्रंथसाहिबात समाविष्ट झाल्या, ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी. पंजाब, राजस्थान, दिल्ली येथे त्यांच्या कीर्तनांनी भक्तीची पताका फडकवली. यामुळे ते राष्ट्रीय संत म्हणून ओळखले गेले.

पुस्तकाची वैशिष्ट्ये


समग्र विवेचन – जीवन, साहित्य, तत्त्वज्ञान यांचा संगम.


अखिल भारतीय दृष्टिकोन – उत्तर भारतातील प्रभावाचाही अभ्यास.


भाषाशैली – सोपी, ओघवती, अभ्यासपूर्ण.


प्रेरणादायी संदेश – आजच्या समाजालाही लागू पडणारे विचार.

आजही जातीयता, भेदभाव, स्पर्धा समाजात दिसतात. अशा वेळी नामदेवांचा समानतेचा संदेश महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या भक्तीतून आपल्याला साधेपणा, ईश्वराशी संवाद व प्रामाणिकतेची जाणीव होते.

“भारतीय साहित्याचे निर्माते संत नामदेव” हे पुस्तक संत नामदेवांचा सर्वांगिण परिचय घडवते. माधव गोपाळ देशमुख यांनी ऐतिहासिक, सामाजिक व साहित्यिक दृष्टिकोनातून संत नामदेवांचे जीवन उलगडले आहे. हे पुस्तक वाचल्यावर संत नामदेव हे केवळ भक्तकवी नव्हते, तर भारतीय साहित्याचे आणि समाजपरिवर्तनाचे खरे निर्माते होते, ही जाणीव होते.

सर्वांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे . धन्यवाद .

 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १३१ सुगंधी वनस्पती आणि सुगंधी उत्पादनं

 



वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १३१

पुस्तकाचे नाव - सुगंधी वनस्पती आणि सुगंधी उत्पादन

लेखकाचे नाव - डॉ बी . पी . वांगीकर

प्रकाशन व आवृत्ती- साकेत प्रकाशन पुणे

पृष्ठे संख्या– ६४

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ ४०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१ ३ १|पुस्तक परिचय

सुगंधी वनस्पती आणि सुगंधी उत्पादन

डॉ. बी. पी. वांगीकर


मानवाच्या जीवनात सुगंधाला फार महत्त्वाचे स्थान आहे. सुगंध हा केवळ इंद्रियांना भुरळ घालणारा अनुभव नसून, तो आरोग्य, संस्कृती, अर्थकारण, शेती, औषधनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने आणि उद्योगधंद्यांशी थेट जोडलेला आहे. म्हणूनच “सुगंधी वनस्पती आणि सुगंधी उत्पादनं” हे पुस्तक आपल्याला एका वेगळ्या पण आवश्यक अशा ज्ञानक्षेत्राची ओळख करून देते. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच उद्योग व्यवसायात रस असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरते.

पुस्तकाची संकल्पना

या पुस्तकामध्ये लेखकाने सुगंधी वनस्पतींची माहिती, त्यांचे प्रकार, लागवड, त्यांच्यापासून मिळणारे नैसर्गिक तेल व अर्क, तसेच त्या तेलापासून तयार होणारी विविध सुगंधी उत्पादने यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. सुगंधशास्त्र, अत्तरनिर्मिती, सौंदर्यप्रसाधन उद्योग आणि औषधनिर्मिती या सर्व अंगांना हे पुस्तक स्पर्श करते.

पहिला भाग : सुगंधी वनस्पतींचा इतिहास व सांस्कृतिक महत्त्व

पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाने सुगंधाचा इतिहास मांडला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत चंदन, अगर, केवडा, गुलाब, मोगरा, कापूर यांचा उपयोग धार्मिक विधी, उत्सव आणि औषधी उपचार यासाठी होत असे. इजिप्शियन संस्कृतीत मृतदेहाच्या ममी तयार करताना सुगंधी तेलांचा वापर होत असे, तर रोम, ग्रीक, पर्शिया या देशांनी अत्तरनिर्मितीला मोठे स्थान दिले होते. भारतीय आयुर्वेदामध्ये ‘गंधद्रव्य’ ही स्वतंत्र चिकित्सा शाखा नमूद केलेली आहे. या सर्व ऐतिहासिक उदाहरणांमुळे सुगंध केवळ विलासी नव्हता तर आरोग्य व अध्यात्माशी निगडित होता हे स्पष्ट होते.

दुसरा भाग : सुगंधी वनस्पतींची ओळख व वर्गीकरण

या भागात सुगंधी वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले आहे. काही वनस्पतींच्या फुलांमधून, तर काहींच्या पानांमधून, बियांमधून, मुळांमधून किंवा खोडामधून सुगंधी द्रव्ये मिळतात. लेखकाने खालील गटांत विभागणी केली आहे :

फुलांपासून सुगंध – गुलाब, जाई, जुई, मोगरा, चंपा, केवडा.

पानांपासून सुगंध – पुदिना, तुळस, पान.

बियांपासून सुगंध – वेलची, जायफळ, धने, बडीशेप.

मुळांपासून सुगंध – वाळा (खस), अश्वगंधा.

खोड किंवा सालांपासून सुगंध – चंदन, दालचिनी.

राळ व गोंदापासून सुगंध – लोहबान, गुग्गुळ.

या विभागामध्ये प्रत्येक वनस्पतीचा शास्त्रीय नाव, लागवडीस योग्य हवामान, जमिनीची आवश्यकता, उत्पादन क्षमता, तसेच आर्थिक महत्त्व यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे.

तिसरा भाग : सुगंध काढण्याच्यापद्धती

या पुस्तकातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगंधी तेलांचे अर्कनिर्मिती तंत्र. पारंपरिक तसेच आधुनिक दोन्ही पद्धतींचे सविस्तर वर्णन लेखकाने केले आहे.

वाफेच्या साहाय्याने आसवन (Steam Distillation) – गुलाब, पुदिना, वेलची यांसारख्या वनस्पतींवर ही पद्धत प्रामुख्याने वापरली जाते.

थंड दाबाने अर्क काढणे (Cold Pressing) – लिंबूवर्गीय फळांपासून सुगंधी तेल मिळवण्यासाठी.

विलायकद्वारे अर्क (Solvent Extraction) – मोगरा, जाईसारख्या नाजूक फुलांसाठी.

एन्फ्ल्युराज (Enfleurage) – पारंपरिक पद्धत ज्यामध्ये प्राणीचरबी किंवा तेलामध्ये फुलांचा सुगंध शोषून घेतला जातो.

सुपरक्रिटिकल कार्बन डायऑक्साईड पद्धत – अत्याधुनिक व पर्यावरणपूरक.

या सर्व प्रक्रियांमध्ये लागणारे उपकरणे, खर्च, उत्पादकता आणि गुणवत्तेवर परिणाम करणारे घटक यांची माहिती पुस्तकात दिलेली आहे.

चौथा भाग : सुगंधी उत्पादनांची माहिती

सुगंधी तेलांपासून विविध प्रकारची उत्पादने तयार होतात. या विभागात लेखकाने अत्तरनिर्मितीची परंपरा, परफ्यूम उद्योग, तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुगंधाचा वापर स्पष्ट केला आहे.

अत्तर व परफ्यूम्स – गुलाब, चंदन, केवडा, मोगरा यांपासून बनणाऱ्या पारंपरिक अत्तरांची माहिती.

साबण, शॅम्पू, क्रीम्स, लोशन्स – सौंदर्यप्रसाधन उद्योगामध्ये सुगंधाचे महत्त्व.

अरोमाथेरपी उत्पादने – आरोग्य आणि मानसिक समाधान देणारी तेलं.

धूप, अगरबत्ती, उटणे, गुलाल – धार्मिक व सांस्कृतिक उपयोग.

औषधनिर्मितीतील उपयोग – पुदिन्याचे तेल, निलगिरी तेल, लवंग तेल यांचा वैद्यकीय वापर.

पाचवा भाग : आर्थिक व औद्योगिक महत्त्व

सुगंधी वनस्पती आणि त्यांची उत्पादने यामध्ये जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ आहे. लेखकाने भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय परफ्यूम उद्योगाचे आकडेवारीसह चित्रण केले आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पन्न देणारा पर्याय म्हणून सुगंधी वनस्पतींची लागवड उपयुक्त ठरते.

निर्यातक्षम क्षमता

ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती

लघुउद्योग व महिला उद्योग समूहांसाठी संधी

सहावा भाग : शाश्वतता आणि संशोधन

या पुस्तकात आधुनिक तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, ऊतकसंवर्धन (tissue culture) यांचा उपयोग करून सुगंधी वनस्पतींच्या लागवडीतील प्रगती कशी साधता येईल यावर चर्चा केली आहे. तसेच पर्यावरणपूरक शेती, सेंद्रिय शेती व जैविक कीडनियंत्रण यावरही मार्गदर्शन आहे.

लेखकाने सुगंधी वनस्पती व उत्पादनांचा अभ्यास केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून न करता, त्यांचे सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि औद्योगिक पैलू एकत्र जोडले आहेत. भाषा सोपी, सरळ, मराठीत असून शास्त्रीय संज्ञांचे योग्य स्पष्टीकरण दिलेले आहे. आवश्यक ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या आणि तक्ते दिल्यामुळे वाचकाला समजणे सोपे होते.

उपयुक्तता

हे पुस्तक पुढील वर्गातील वाचकांसाठी विशेष उपयुक्त ठरते :

कृषी व बागायती विषयाचे विद्यार्थी

औषधनिर्मिती व सुगंध उद्योगाशी संबंधित संशोधक

शेतकरी व उद्योजक

अत्तरनिर्मिती किंवा सौंदर्यप्रसाधन व्यवसाय करू इच्छिणारे तरुण

सर्वसामान्य वाचक ज्यांना निसर्ग आणि सुगंध याविषयी रस आहे

“सुगंधी वनस्पती आणि सुगंधी उत्पादनं” हे पुस्तक वाचकाला सुगंधाचा बहुआयामी प्रवास घडवते. सुगंधी वनस्पतींचे शास्त्र, त्यांची शेती, त्यांच्यापासून होणारी उत्पादने आणि त्या माध्यमातून घडणारे आर्थिक व सांस्कृतिक योगदान या सर्वांचा एकत्रित अभ्यास या पुस्तकातून करता येतो. आधुनिक काळात रोजगारनिर्मिती, पर्यावरणपूरक शेती आणि निर्यातक्षम उत्पादनांचा विचार करता हे पुस्तक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरते.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र १३०सूत्रसंचालना विषयी सर्व काही

 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य




पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १३०

पुस्तकाचे नाव - सुत्रसंचालनाविषयी सर्वकाही

लेखकाचे नाव - संदीप मगदूम

प्रकाशन व आवृत्ती- अक्षरदालन प्रकाशन कोल्हापूर

पृष्ठे संख्या– २२३

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २७५

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚


१ ३०|पुस्तक परिचय

सूत्रसंचालनाविषयी सर्व काही

 संदीप मगदूम


सूत्रसंचालन ही कला आहे, कौशल्य आहे आणि एकाचवेळी जबाबदारी देखील आहे. एखादा छोटासा शालेय कार्यक्रम असो वा राज्यस्तरीय महोत्सव, त्या ठिकाणी सूत्रसंचालक हा आत्मा ठरतो. त्याच्या वाणीने, आत्मविश्वासाने, शब्दकळेने आणि प्रसंगानुरूप संवाद साधण्याच्या क्षमतेने संपूर्ण कार्यक्रमाची रंगत खुलते. परंतु हे कौशल्य सहज मिळत नाही. त्यासाठी अभ्यास, साधना, योग्य दिशा आणि सततचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे.


या पार्श्वभूमीवर संदीप मगदूम सरांचे “सूत्रसंचालना विषयी सर्व काही” हे पुस्तक वाचकांसमोर येते. या पुस्तकात सूत्रसंचालनाशी निगडित जवळपास सर्व पैलूंचा विचार केला गेला असून, नवोदित सूत्रसंचालकांपासून ते प्रगल्भ सूत्रसंचालकांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ ठरतो.


विषयरचना आणि मांडणी

पुस्तकाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची सुसूत्र विषयरचना. वाचकाला टप्प्याटप्प्याने सूत्रसंचालनाच्या जगात घेऊन जाण्याची ही प्रक्रिया अत्यंत आकर्षक आणि मार्गदर्शक आहे.


१. सूत्रसंचालन व सूत्रसंचालक

या प्रकरणात सूत्रसंचालन म्हणजे नेमके काय, त्याची आवश्यकता काय आणि सूत्रसंचालकाचे स्थान कसे असते हे स्पष्ट केले आहे. अनेकांना वाटते सूत्रसंचालन म्हणजे केवळ नावं जाहीर करणे. परंतु ते त्यापेक्षा कितीतरी व्यापक कार्य आहे. या प्रकरणातून सूत्रसंचालकाचे कार्य एक दुवा, एक संयोजक आणि कार्यक्रमाचा आत्मा म्हणून समोर येते.


२. सूत्रसंचालकाची भूमिका

सूत्रसंचालक हा फक्त कार्यक्रम चालवणारा नसून वातावरण निर्मिती करणारा असतो. त्याचा आत्मविश्वास, शब्दसंपदा, विनोदबुद्धी, उपस्थितीचे भान यावरून कार्यक्रम यशस्वी ठरतो. सूत्रसंचालकाने कोणत्या भूमिका पार पाडल्या पाहिजेत याचे अतिशय नेमके वर्णन येथे केले आहे.


३. संयोजकाच्या भूमिकेत

कधी कधी सूत्रसंचालक संयोजकाच्या भूमिकेत येतो. त्याला प्रेक्षक, मान्यवर, आयोजक यांच्यातील पूल व्हावे लागते. ही भूमिका पार पाडताना कोणते गुण आवश्यक आहेत यावर पुस्तकात विचार मांडला आहे.


४. कार्यक्रमांचे प्रकार आणि सूत्रसंचालन

शालेय, महाविद्यालयीन, सांस्कृतिक, शासकीय, सामाजिक अशा विविध कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचा सूर, ढंग, भाषाशैली वेगवेगळी असते. या प्रकरणात कार्यक्रमांचे प्रकार आणि त्यासाठी लागणारे सूत्रसंचालनाचे वेगवेगळे पैलू दिलेले आहेत.


५. सूत्रसंचालनाची साधना

कोणत्याही कलेप्रमाणे सूत्रसंचालनातही साधना हवी. वाचन, लेखन, शब्दसंपदा वाढविणे, आवाजावर नियंत्रण, शिस्तबद्ध सादरीकरण यासाठी काय करावे याचे विवेचन या प्रकरणात केलेले आहे.


६. सूत्रसंचालकाची आचारसंहिता

सूत्रसंचालकाला वक्तृत्वाची सत्ता असली तरी ती संयमाने वापरण्याची जबाबदारीही आहे. कोणते वाक्य बोलायचे आणि कोणते टाळायचे, विनोदाची मर्यादा, मान्यवरांचा सन्मान, प्रसंगाचे गांभीर्य याची जाण असणे आवश्यक आहे. या अंगाने संदीप सरांनी दिलेली आचारसंहिता म्हणजे नव्या पिढीसाठी दिशा दर्शक दीप आहे.


७. आवाजाची काळजी

आवाज हा सूत्रसंचालकाचा मुख्य भांडार. तो शुद्ध, स्पष्ट आणि प्रभावी ठेवण्यासाठी श्वसनतंत्र, उच्चार, स्वरभंग, टोन, गती यांचा कस कसा लावावा हे या प्रकरणात सोप्या भाषेत सांगितले आहे.


८. विख्यात सूत्रसंचालकांचे सूत्रसंचालन

मराठीतच नव्हे तर देशभरात अनेक थोर सूत्रसंचालकांनी आपली छाप उमटवली आहे. त्यांचे अनुभव, शैली, वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून नव्या सूत्रसंचालकाला खूप काही शिकता येते. हे प्रकरण प्रेरणादायी ठरते.


९. वेगवेगळे नमुने – सूत्रसंचालनाचे

शालेय परिपाठ, विज्ञान प्रदर्शन, स्वातंत्र्यदिन, सहस्रचंद्रदर्शन सोहळा, विवाह सोहळा, क्रीडा स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांचे नमुना सूत्रसंचालन येथे दिलेले आहे. हे नमुने म्हणजे प्रत्यक्ष वापरात आणता येतील असे तयार मार्गदर्शन आहे.


१०. महाराष्ट्रातील नामवंत सूत्रसंचालकांच्या संहिता

प्रख्यात सूत्रसंचालकांनी दिलेली संहिता, अनुभवकथन आणि त्यांचे मार्गदर्शन या विभागात समाविष्ट आहे. हे वाचताना सूत्रसंचालन ही कला किती विविधतेने फुलू शकते हे उमगते.


११. करिअरच्या नव्या संधी

सूत्रसंचालन केवळ छंद राहिलेले नाही, तर ते एक करिअर झाले आहे. लग्नसोहळे, इव्हेंट मॅनेजमेंट, टीव्ही कार्यक्रम, सोशल मीडिया या सर्व क्षेत्रांत सूत्रसंचालकाची मागणी आहे. नव्या पिढीसाठी हे प्रकरण करिअर मार्गदर्शन ठरते.


१२. इव्हेंट मॅनेजमेंट

सूत्रसंचालक आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांचे अतूट नाते आहे. कार्यक्रमाचे नियोजन, सादरीकरण, वेळेचे भान या सर्व बाबींबाबत इव्हेंट मॅनेजमेंटशी सूत्रसंचालन कसे जोडलेले आहे याचे समग्र विवेचन यात आहे.


१३. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सूत्रसंचालन

हे प्रकरण पुस्तकाचा प्राण आहे. उद्घाटन समारंभ, वाढदिवस, पुतळा अनावरण, स्वातंत्र्य, मातृदेवो भव, मराठी भाषा, देव-देवता, प्रेरणा, निरोप, सत्कार, शेतकरी, प्रबोधनात्मक, विनोदी असे असंख्य विषय घेऊन सूत्रसंचालनाच्या संदर्भासाठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सूत्रसंचालकाला कोणत्याही प्रसंगाला सुसंगत मजकूर सहज सापडतो.


१४. संतवचने, १५. हिंदी काव्यपंक्ती/शेरो-शायरी, १६. चित्रपटातील प्रसिद्ध संवाद

सूत्रसंचालनात प्रसंगानुरूप एखादा शेर, संतवचन किंवा लोकप्रिय संवाद वापरला तर रंगत खुलते. 


१७. सूत्रसंचालनावेळीचे काही किस्से

अनुभवातून शिकलेले काही किस्से, विनोदी प्रसंग किंवा अनपेक्षित घटना येथे दिलेल्या आहेत. हे वाचताना सूत्रसंचालकाला सावधानतेबरोबरच प्रसंगावधान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.


पुस्तकाची वैशिष्ट्ये

संपूर्णता : सूत्रसंचालनाविषयी जवळपास सर्व पैलूंचा अभ्यास.


सोपेपणा : भाषा सहज, सरळ आणि समजण्यास सोपी.


व्यावहारिकता : केवळ सिद्धांत नाही, तर प्रत्यक्ष वापरासाठी नमुने आणि संहिता.


प्रेरणादायी स्वरूप : विख्यात सूत्रसंचालकांचे अनुभव, संतवचने, शायरी यामुळे उत्साह वाढतो.


नव्या संधींचे मार्गदर्शन : सूत्रसंचालनाला करिअर म्हणून पाहण्याचा नवा दृष्टीकोन.

तुम्ही विद्यार्थी असाल आणि शालेय परिपाठात बोलायची संधी मिळत असेल,

तुम्ही महाविद्यालयीन उपक्रमात सहभागी होत असाल,

तुम्ही लग्न, सत्कार, महोत्सव अशा कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी स्वीकारत असाल,

किंवा तुम्ही व्यावसायिक पातळीवर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये उतरायचे ठरवत असाल –

या सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

यातून वाचकाला केवळ माहितीच नाही, तर आत्मविश्वास, शब्दसंपदा, विचारसरणी आणि प्रसंगावधानही विकसित करता येते.

“सूत्रसंचालना विषयी सर्व काही” हे संदीप मगदूम सरांचे पुस्तक म्हणजे सूत्रसंचालकासाठी दिशा दाखवणारा दीपस्तंभच आहे. यात सूत्रसंचालनाची व्याख्या, त्याचे प्रकार, आचारसंहिता, आवाजाची जपणूक, प्रत्यक्ष नमुने, संतवचने, शायरी, संवाद – सर्व काही एकत्र आणले आहे. त्यामुळे हे पुस्तक एकाच वेळी अभ्यासपूर्ण, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरते.

नवोदित सूत्रसंचालक असो किंवा अनुभवी – प्रत्येकाला या ग्रंथातून काही ना काही नवीन शिकायला मिळेल. यामुळे हे पुस्तक केवळ मार्गदर्शक न राहता सहप्रवासी ठरते.

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

पुस्तक क्र. १२९ विचारदीप

 



वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२९

पुस्तकाचे नाव - विचार दीप

लेखकाचे नाव - डॉ .शुभांगी कुंभार

प्रकाशन व आवृत्ती- अथर्वकुणाल प्रकाशन

पृष्ठे संख्या– १६०

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२९||पुस्तक परिचय

विचारदीप

डॉ . शुभांगी कुंभार


विचारांचा दीप जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. डॉ. शुभांगी पवार लिखित विचारदीप हा निबंधसंग्रह नेमका असाच एक प्रकाशस्तंभ आहे. विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक विषयांवर लेखन करताना लेखिकेने आपल्या चिंतनशीलतेचा, अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचा आणि अनुभवसंपन्न लेखनकलेचा प्रभावी परिचय करून दिला आहे.

या पुस्तकात एकंदर चौदा निबंध असून प्रत्येक निबंध हा स्वतंत्र विचारविश्व उलगडणारा आहे. माझ्या स्वप्नातील भारत हा निबंध वाचताना तरुणाईसमोर एक उन्नत, प्रगत आणि मूल्याधिष्ठित भारताची प्रतिमा उभी राहते. छत्रपती शिवाजी महाराज : जीवन व कार्य तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही निबंध वाचताना वाचकांना स्वराज्य संस्थापकांच्या कार्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राजकारणाचा अभ्यास लेखिकेने प्रभावी शब्दांत मांडला आहे.

इतिहासातील महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना लेखिकेने केवळ माहिती दिलेली नाही, तर त्यांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली आहे. या तिन्ही व्यक्तिमत्त्वांनी केलेले समाजपरिवर्तन आणि शिक्षणक्षेत्रातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व या निबंधांमधून ठळकपणे दिसून येते.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवणूक हा निबंध विशेषतः शिक्षणक्षेत्रातील वाचकांना भावणारा आहे. आजच्या डिजिटल युगात वाचनाची गोडी कमी होत चालली असताना वाचनामुळे होणारे चारित्र्यनिर्माण आणि विचारशक्तीची वाढ याची जाणीव हा निबंध करून देतो. नाथांची भारुडे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम हा लेख लोकपरंपरेतील शिक्षणपद्धतीचा अभ्यास करणारा आहे, तर सिद्धार्थ गौतम बुद्ध : जीवन व कार्य हा निबंध शांतता, करुणा आणि समता यांचा संदेश पोहोचवतो.

याशिवाय काही निबंध हे अत्यंत ज्वलंत आणि समकालीन प्रश्नांवर भाष्य करणारे आहेत. स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते? या लेखात वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करून देत स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला व्यक्तिगत स्तरावर कसे हातभार लावता येईल यावर विचार केलेला आहे. पाणी हेच जीवन या निबंधात जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले असून हवामान बदल या लेखात पर्यावरणीय संकटांवर प्रकाश टाकला आहे. राष्ट्रसंतांना अपेक्षित युवा हा निबंध समाजहितासाठी कार्य करणाऱ्या सजग, जबाबदार आणि चारित्र्यसंपन्न युवकाची गरज अधोरेखित करतो. शेवटी खरंच ‘ती’ बदलली आहे का? या निबंधात स्त्रीच्या सामाजिक स्थितीचा आणि बदलत्या काळातील तिच्या भूमिकेचा अभ्यास केला आहे.

डॉ. शुभांगी पवार या मूळतः शिक्षिका असल्याने त्यांचे लेखन सोप्या, सहज आणि प्रभावी भाषेत आहे. त्यांनी अनेक निबंध स्पर्धांत यश मिळवले असून त्या अनुभवातून परिपक्व झालेलं लेखन या ग्रंथात दिसून येतं. पुस्तकातील प्रत्येक निबंध वाचकाला विचार करण्यास भाग पाडतो, प्रेरणा देतो आणि समाजाबद्दलची जबाबदारी वाढवतो.

विचारदीप हा केवळ निबंधसंग्रह नाही, तर विद्यार्थ्यांसाठी आदर्श वाचन, शिक्षकांसाठी मार्गदर्शक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी चिंतनाचा खजिना आहे. इतिहास, समाज, शिक्षण आणि पर्यावरण या सर्वच क्षेत्रांचा आढावा घेताना लेखिका जिथे विचारांची दिशा दाखवतात तिथेच नव्या पिढीला कृतीची प्रेरणा देतात.

खऱ्या अर्थाने हा ग्रंथ विचारांचा दीप प्रज्वलित करणारा असून, तो प्रत्येक ग्रंथप्रेमीने आपल्या वाचनात सामील करून घ्यावा अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Tuesday, September 16, 2025

पुस्तक क्र. १२८ छत्रपतींची राजधानी सातारा

 



वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२८

पुस्तकाचे नाव - छत्रपतींची राजधानी सातारा

लेखकाचे नाव - श्री. कृष्णा भोसले

प्रकाशन व आवृत्ती- अक्षय प्रिंटर्स सातारा

पृष्ठे संख्या– १६६

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २२०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२८||पुस्तक परिचय

छत्रपतींची राजधानी सातारा

श्री. कृष्णा भोसले

छत्रपतींची राजधानी म्हणजे सातारा अशी सर्वत्र ओळख असलेला आमचा सातारा . पण सातारा ही छत्रपतींची राजधानी कशी झाली याचा इतिहास पाहायचा असेल तर छत्रपतींची राजधानी सातारा हे कृष्णा भोसले सरांच पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.

यामध्ये एकूण ३ भाग आहेत.

भाग पहिला

* छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्व इतिहास :

* छत्रपती शिवरायांचे घराणे वंशवेल : (शहाजीराजे ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले)

भाग दुसरा :

* छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा :

(अफजलखानाची भेट, शिवरायांचे युद्ध पद्धत व त्यांचे वीर मावळे, शिवरायांचे आरमार व शस्त्रास्त्रे, सुरतेची लूट, संदेश वहन यंत्रणा इ.)

भाग तिसरा :

* सातारच्या जवळपासची ऐतिहासिक स्थळे :

राजधानी सातारा (अजिंक्य तारा, पोवई नाका, चार भिंती हुतात्मा स्मारक, फाशीचा वड, सातारचे प्रसिद्ध कंदी पेढे, मॅरेथॉन शर्यत, नटराज मंदिर, शिवाजी वस्तू संग्रहालय, कास पठार, सज्जनगड-परळी, संगम माहुली व कैलास स्मशानभूमी, लिंबची बारा मोटेची विहीर, धावडशी-ब्रह्मेद्र स्वामी इ.)

* शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श शिक्षण प्रसारक व समाजसेवक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे ही माहिती त्यांची सुपुत्र आदरणीय संकेत भोसले यांनी खूप छान लिहिलेली आहे .* छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ राजधानी रायगड किल्ला होता. मात्र पुढील काळात, विशेषतः संभाजी महाराजांच्या निधनानंतर आणि औरंगजेबाशी दीर्घकालीन संघर्ष सुरू असताना, सातारा ही राजधानी म्हणून महत्त्वाची ठरली.

सातारा राजधानीविषयी माहिती :

साताऱ्याचे स्थान :

सातारा जिल्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. इथल्या अजिंक्यतारा किल्ल्यांमुळे या शहराला महत्त्व प्राप्त झाले.

राजधानीची निवड :

रायगडवर मुघलांनी ताबा मिळवल्यानंतर साताऱ्याला राजधानीचा दर्जा देण्यात आला.

साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला सुरक्षित आणि डोंगररांगा वेढलेला असल्यामुळे संरक्षणासाठी सोयीस्कर होता.

शिवरायांच्या पश्चात :

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, त्यानंतर राजाराम महाराज यांच्या काळात मुघलांविरुद्ध संघर्ष सुरू होता.

 शाहू महाराजांनी सातारा येथे आपले राज्याभिषेक करून साताऱ्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवले.

ऐतिहासिक महत्त्व :

साताऱ्याहून मराठा साम्राज्याचे धोरण आखले जाई.

पेशवाई उदयास आल्यानंतर पुणे हे राजकीय व प्रशासकीय केंद्र झाले; पण साताऱ्याला "छत्रपतींची राजधानी" म्हणून मानमरातब मिळत राहिला.

सातारा येथे छत्रपतींचे दरबार भरत, राज्यकारभाराचा निर्णय घेतला जाई.

आजचे सातारा :

"शिवरायांची राजधानी" म्हणून सातारा आजही प्रसिद्ध आहे.

किल्ले अजिंक्यतारा, सज्जनगड, कास पठार, सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तू या इतिहासाच्या साक्षी आहेत. थोडक्यात सांगायचं तर, रायगडनंतर सातारा हे मराठा साम्राज्याचे नवे केंद्र ठरले आणि छत्रपतींच्या गादीला इथून प्रतिष्ठा लाभली.

आदरणीय कृष्णा भोसले सर माझे गुरु असून त्यांचे "छत्रपतींची राजधानी सातारा" हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असे आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी इतिहासाचा घेतलेला ध्यास, साताऱ्याविषयीची त्यांची जिज्ञासा आणि लेखनातली प्रामाणिकता ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते.

भोसले सरांची लेखनशैली अत्यंत सोपी, आकर्षक आणि बारकाईने निरीक्षण करणारी आहे. प्रत्येक घटनेचा, प्रत्येक ऐतिहासिक पुराव्याचा आणि प्रत्येक बारकाव्याचा त्यांनी सखोल अभ्यास करून पुस्तकात समावेश केलेला आहे. साताऱ्याच्या इतिहासात, विशेषतः छत्रपतींच्या राजधानीच्या दृष्टीने, अनेक महत्वाचे पैलू या पुस्तकातून उलगडलेले दिसतात.

ज्यांना साताऱ्याचा इतिहास, छत्रपतींचा वारसा आणि मराठ्यांच्या वैभवशाली गाथेबद्दल जाणून घ्यायची उत्कंठा आहे, अशा प्रत्येकाने हे पुस्तक नक्कीच वाचावे. हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर वाचकांना इतिहासाची जाणीव करून देते आणि त्या काळात डोकावण्याची संधी उपलब्ध करून देते.

खरंच, "छत्रपतींची राजधानी सातारा" हे पुस्तक साताऱ्याविषयी अभ्यास करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी अमूल्य ठेवा आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे काम माझे मित्र आदरणीय निलेश चौधरी कलादिग्दर्शक यांनी खूप छान केलेलं आहे त्यामुळे या पुस्तकाचा जिवंतपणा आणखी वाढलेला आहे .आदरणीय भोसले सरांच्या लेखन प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना मनोभावे वंदन धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

Wednesday, September 3, 2025

पुस्तक क्र. १२७ हरवलेलं मन


 वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- १२ ७

पुस्तकाचे नाव - हरवलेलं मनं

लेखकाचे नाव - बालाजी नायकवडी

प्रकाशन व आवृत्ती- ज्ञानसंवर्धन प्रकाशन कोल्हापूर

पृष्ठे संख्या– ८८

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२ ७||पुस्तक परिचय


हरवलेलं मनं

बालाजी नायकवडी


जीवनाच्या क्षणभंगुर वाटेत

 मिळतंच असं कोणीतरी 

विस्कटलेलं मन आपलं 

आधाराने सावरणारं कुठेतरी

“हरवलेलं मन” हा कवी बालाजी बिभीषण नायकवडी यांचा अत्यंत हृदयस्पर्शी कवितासंग्रह आहे. या संग्रहात जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श करणारे भावविश्व आपल्याला अनुभवायला मिळते.


श्रीगणरायाच्या भक्तीतून उमटलेली ओंजळभर प्रार्थना, आईच्या मायेने भारावलेला शब्दगंध, शाळेच्या आठवणींनी डोळ्यांत आणलेला गोड दरवळ, तर कधी दुष्काळाच्या वेदनेतून प्रकट झालेली ओलाव्याची आस – अशा विविध भावछटांनी हा संग्रह समृद्ध झाला आहे.

कवी बालाजी बिभीषण नायकवडी यांचा “हरवलेलं मन” हा कवितासंग्रह म्हणजे ग्रामीण संवेदना, सामाजिक जाणिवा आणि वैयक्तिक भावविश्व यांचं एक सुंदर मिश्रण आहे.


कवीची भाषा साधी, सरळ आणि मनाला भिडणारी आहे. अलंकारांचा आडपडदा न लावता त्यांनी जीवनातील अनुभव थेट मांडले आहेत. त्यामुळे वाचकांना प्रत्येक कविता आपल्याच घराची, गावची किंवा आयुष्याची वाटते.

कवी बालाजी नायकवडी यांचा “हरवलेलं मन” हा संग्रह ग्रामीण-नगरकालीन अनुभव, कुटुंबव्यवहार, निसर्ग, सामाजिक जाणिवा आणि अध्यात्म यांचा संतुलित ताळमेळ साधतो. कवी प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांच्या कवितांना बालदृष्टीची निरागसता, उपदेशाऐवजी समजुतीचा साक्षेप, आणि रोजच्या आयुष्यातून येणारे सूक्ष्म निरीक्षण यांची खास छाप लाभते. शब्द सरळ असले तरी त्यामागची संवेदना घन आहे—म्हणून कविता वाचकाला थेट भिडतात.

श्री गणराया”*मध्ये लोकविश्वासांबरोबर वैयक्तिक आशा-आकांक्षा मिसळतात. प्रार्थना ही केवळ विनंती न राहता धीर देणारी सामूहिक ऊर्मी होते.

आई”, “नाती”, “बंध राखीचे”, “नवराबायको”*मधून स्नेह, जबाबदारी व ताणतणावांचे वास्तववादी चित्रन येते—गोडवे करण्यापेक्षा संबंधांची नाजूक गतिशीलता टिपली जाते.

शाळेची आठवण” सारख्या कवितांत शाळा म्हणजे फक्त इमारत नाही; ती आठवणी, मूल्ये, खेळ, चूक-सुधार यांचा जिवंत पट आहे. बालमन समजून घेणारा शिक्षक-कवी भाषेत उपदेश टाळून कथा-रस निर्माण करतो.

दुष्काळ”*मध्ये केवळ पाण्याची टंचाई नाही, तर मानवी नात्यांतील कोरडेपणाचाही सूचक संदर्भ आहे. “बिऱ्हाड” स्थलांतरित आयुष्याची असुरक्षितता दाखवते. “चांदणं”, “सागरलाटा” निसर्गप्रतिमांतून आश्वासक प्रकाश व अस्थिर जीवनलय उलगडते.

“महाराष्ट्र माझा”*मध्ये भूमीशी असलेला अभिमान आणि श्रमशीलतेचा गौरव प्रकर्षाने उमटतो; “एक मुलगी असावी” संवेदनशील, आत्मीय आणि समतोल स्त्रीदृष्टी मांडते.

कवीची भाषा बोलकी, सुलभ आणि लयबद्ध आहे. मुक्तछंद प्रधान; तरी ओवीधाट लय, साद घालणारे पुनरुक्ती-अनुप्रास, आणि दैनंदिन बोलचालीतील वाक्यरचना कवितांना नैसर्गिक प्रवाह देतात.

कविता वैयक्तिक आठवणींपासून सुरू होऊन सामूहिक स्मृती आणि नैतिक जाण यांपर्यंत पोचतात. दुष्काळ/बिऱ्हाडमधील सामाजिक वास्तवाला भावुकतेचा आव आणला जात नाही; तर प्रश्न विचारणारी, आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणारी भाषा वापरली जाते. एक मुलगी असावीमध्ये ‘करुणा’ आणि ‘स्वायत्तता’ यांचा समतोल साधून उपदेशात्मक सूर टाळला आहे.

“हरवलेलं मन” हे मनातल्या हरवलेल्या, पण सतत साद देणाऱ्या भावस्वरांचे संकलन आहे. प्राथमिक शिक्षक-कवीची नजाकत—समजुतीची, संयमाची आणि जिव्हाळ्याची—या संग्रहाला वेगळं उबदारपण देते. कुटुंब, नाती, निसर्ग आणि समाज यांचा असा मनोगर्भ आणि वाचनयोग्य संवाद शोधणाऱ्या वाचकांसाठी हा संग्रह जरूरीचा ठरतो.

हरवलेलं मन” मध्ये बालाजी बिभीषण नायकवडी रोजच्या जगण्यातले हसू-ओलावा-आसवे टिपतात. आईची माया, शाळेचं ऊनसावली, दुष्काळाची तडफड, राखीचा नातेस्नेह, नवराबायकोचे कुजबुज, आणि “महाराष्ट्र माझा”चा श्रमअभिमान—सगळं इथे आहे. 


न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य

 ही बीजे माणसात रुजवून

 शिक्षणाची इथे ज्योत पेटवली 

अशा शाहू, फुले, आंबेडकर 

यांचा महाराष्ट्र माझा


संतांची भूमी, कुस्तीची दंगल

 देवीची शक्ती, गणेशाचे अष्टक 

इथल्या मातीतच आपुलकीचा ठेवा असा विविध गुणांचा महाराष्ट्र माझा.


प्राथमिक शिक्षकाच्या संवेदनशील नजरेतून उमटलेली ही साधी पण मनावर दीर्घकाळ ठाण मांडणारी काव्ययात्रा, वाचकाला स्वतःकडे परत नेते.

नक्की वाचा . सरांच्या लेखन प्रवासास खूप शुभेच्छा .

धन्यवाद .

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा