वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १२८
पुस्तकाचे नाव - छत्रपतींची राजधानी सातारा
लेखकाचे नाव - श्री. कृष्णा भोसले
प्रकाशन व आवृत्ती- अक्षय प्रिंटर्स सातारा
पृष्ठे संख्या– १६६
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २२०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१२८||पुस्तक परिचय
छत्रपतींची राजधानी सातारा
श्री. कृष्णा भोसले
छत्रपतींची राजधानी म्हणजे सातारा अशी सर्वत्र ओळख असलेला आमचा सातारा . पण सातारा ही छत्रपतींची राजधानी कशी झाली याचा इतिहास पाहायचा असेल तर छत्रपतींची राजधानी सातारा हे कृष्णा भोसले सरांच पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे.
यामध्ये एकूण ३ भाग आहेत.
भाग पहिला
* छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्व इतिहास :
* छत्रपती शिवरायांचे घराणे वंशवेल : (शहाजीराजे ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले)
भाग दुसरा :
* छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा :
(अफजलखानाची भेट, शिवरायांचे युद्ध पद्धत व त्यांचे वीर मावळे, शिवरायांचे आरमार व शस्त्रास्त्रे, सुरतेची लूट, संदेश वहन यंत्रणा इ.)
भाग तिसरा :
* सातारच्या जवळपासची ऐतिहासिक स्थळे :
राजधानी सातारा (अजिंक्य तारा, पोवई नाका, चार भिंती हुतात्मा स्मारक, फाशीचा वड, सातारचे प्रसिद्ध कंदी पेढे, मॅरेथॉन शर्यत, नटराज मंदिर, शिवाजी वस्तू संग्रहालय, कास पठार, सज्जनगड-परळी, संगम माहुली व कैलास स्मशानभूमी, लिंबची बारा मोटेची विहीर, धावडशी-ब्रह्मेद्र स्वामी इ.)
* शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श शिक्षण प्रसारक व समाजसेवक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे ही माहिती त्यांची सुपुत्र आदरणीय संकेत भोसले यांनी खूप छान लिहिलेली आहे .* छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ राजधानी रायगड किल्ला होता. मात्र पुढील काळात, विशेषतः संभाजी महाराजांच्या निधनानंतर आणि औरंगजेबाशी दीर्घकालीन संघर्ष सुरू असताना, सातारा ही राजधानी म्हणून महत्त्वाची ठरली.
सातारा राजधानीविषयी माहिती :
साताऱ्याचे स्थान :
सातारा जिल्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. इथल्या अजिंक्यतारा किल्ल्यांमुळे या शहराला महत्त्व प्राप्त झाले.
राजधानीची निवड :
रायगडवर मुघलांनी ताबा मिळवल्यानंतर साताऱ्याला राजधानीचा दर्जा देण्यात आला.
साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला सुरक्षित आणि डोंगररांगा वेढलेला असल्यामुळे संरक्षणासाठी सोयीस्कर होता.
शिवरायांच्या पश्चात :
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, त्यानंतर राजाराम महाराज यांच्या काळात मुघलांविरुद्ध संघर्ष सुरू होता.
शाहू महाराजांनी सातारा येथे आपले राज्याभिषेक करून साताऱ्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवले.
ऐतिहासिक महत्त्व :
साताऱ्याहून मराठा साम्राज्याचे धोरण आखले जाई.
पेशवाई उदयास आल्यानंतर पुणे हे राजकीय व प्रशासकीय केंद्र झाले; पण साताऱ्याला "छत्रपतींची राजधानी" म्हणून मानमरातब मिळत राहिला.
सातारा येथे छत्रपतींचे दरबार भरत, राज्यकारभाराचा निर्णय घेतला जाई.
आजचे सातारा :
"शिवरायांची राजधानी" म्हणून सातारा आजही प्रसिद्ध आहे.
किल्ले अजिंक्यतारा, सज्जनगड, कास पठार, सातारा शहरातील ऐतिहासिक वास्तू या इतिहासाच्या साक्षी आहेत. थोडक्यात सांगायचं तर, रायगडनंतर सातारा हे मराठा साम्राज्याचे नवे केंद्र ठरले आणि छत्रपतींच्या गादीला इथून प्रतिष्ठा लाभली.
आदरणीय कृष्णा भोसले सर माझे गुरु असून त्यांचे "छत्रपतींची राजधानी सातारा" हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असे आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी इतिहासाचा घेतलेला ध्यास, साताऱ्याविषयीची त्यांची जिज्ञासा आणि लेखनातली प्रामाणिकता ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरते.
भोसले सरांची लेखनशैली अत्यंत सोपी, आकर्षक आणि बारकाईने निरीक्षण करणारी आहे. प्रत्येक घटनेचा, प्रत्येक ऐतिहासिक पुराव्याचा आणि प्रत्येक बारकाव्याचा त्यांनी सखोल अभ्यास करून पुस्तकात समावेश केलेला आहे. साताऱ्याच्या इतिहासात, विशेषतः छत्रपतींच्या राजधानीच्या दृष्टीने, अनेक महत्वाचे पैलू या पुस्तकातून उलगडलेले दिसतात.
ज्यांना साताऱ्याचा इतिहास, छत्रपतींचा वारसा आणि मराठ्यांच्या वैभवशाली गाथेबद्दल जाणून घ्यायची उत्कंठा आहे, अशा प्रत्येकाने हे पुस्तक नक्कीच वाचावे. हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर वाचकांना इतिहासाची जाणीव करून देते आणि त्या काळात डोकावण्याची संधी उपलब्ध करून देते.
खरंच, "छत्रपतींची राजधानी सातारा" हे पुस्तक साताऱ्याविषयी अभ्यास करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी अमूल्य ठेवा आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे काम माझे मित्र आदरणीय निलेश चौधरी कलादिग्दर्शक यांनी खूप छान केलेलं आहे त्यामुळे या पुस्तकाचा जिवंतपणा आणखी वाढलेला आहे .आदरणीय भोसले सरांच्या लेखन प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना मनोभावे वंदन धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment