वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १२२
पुस्तकाचे नाव -महाराष्ट्र भूषण
लेखकाचे नाव - बालाजी बिभीषण नाईकवाडी
प्रकाशन व आवृत्ती- गुरुमाऊली प्रकाशन लातूर
पृष्ठे संख्या– ९२
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १२०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१२२||पुस्तक परिचय
महाराष्ट्र भूषण
The Spirit of Maharashtra
महाराष्ट्र शासनाने दिला जाणारा "महाराष्ट्र भूषण" हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या पुरस्काराची सुरुवात १९९६ साली झाली. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. साहित्य, संगीत, कला, विज्ञान, क्रीडा, सामाजिक सेवा, आरोग्य आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांतील मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कारप्राप्त व्यक्तीस ₹२५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एक स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र दिले जाते. पु. ल. देशपांडे हे या पुरस्काराचे पहिले मानकरी होते. त्यानंतर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, बाबा आमटे, रतन टाटा यांसारख्या थोर व्यक्तींना हा गौरव प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्याकडून दिला जाणारा मान-सन्मान असून, त्यातून त्या व्यक्तीच्या कार्याची आणि योगदानाची कदर व्यक्त केली जाते.
अशा या महाराष्ट्र भूषण प्राप्त झालेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचा परिचय या पुस्तकात लेखक बालाजी नाईकवाडी यांनी आपल्या खास शैलीत दिलेला आहे .विशेष म्हणजे हे पाठ्यपुस्तक मला वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला प्राप्त झाले त्यामुळे आजच्या वाढदिवसा दिवशी या पुस्तकाच्या परिचय टाकावा असे मनोमन वाटले .या पुस्तकाचे वाचन करून नक्कीच काहीतरी आदर्शवत करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते .काही करता आलं नाही तरी आपल्यापासून आपल्या देशाला समाजाला आपला त्रास होऊ नये हे नक्की करावे . बालाजी नाईकवाडी हे चांगले लेखक आणि कवी आहेत .या पुस्तकात त्यांनी एकूण 19 दिग्गजांचा परिचय दिलेला आहे .सर्वजणच आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहेत आणि महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना सन्मानाने बहाल केलेला आहे .
खालील सर्वांना हा पुरस्कार बहाल करण्यात आलेला आहे .
पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे
भारताची स्वर कोकिळा - लता मंगेशकर
विजय पांडुरंग भटकर
सचिन रमेश तेंडुलकर
जोशी, भीमसेन
अभय बंग
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे
रघुनाथ अनंत माशेलकर
रतन नवल टाटा
रामराव कृष्णराव पाटील
नारायण विष्णू धर्माधिकारी
मंगेश केशव पाडगांवकर
सुलोचना लाटकर
जयंत नारळीकर
अनिल काकोडकर
बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे
आशा भोसले
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी
अशोक सराफ
प्रत्येक क्षेत्रातील हे सर्वजण दिग्गज आहेत . यांच्या कार्याची माहिती घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे . बालाजी नाईकवडी यांनी या सर्वांचाच आपल्या खास अशा शैलीत सुंदर असा परिचय या पुस्तकात करून दिला आहे .
"महाराष्ट्र भूषण" हे पुस्तक वाचल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात, स्पर्धा परीक्षेच्या तयारीत व प्रकल्प लेखनात मदत होते; शिक्षकांना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उदाहरणे देण्यासाठी उपयोगी ठरते; तसेच पालक, सामान्य वाचक, लेखक, निवेदक यांना महाराष्ट्रातील थोर व्यक्तींच्या कार्याची माहिती मिळते. या पुस्तकामुळे समाजसेवा, साहित्य, कला, विज्ञान आदी विविध क्षेत्रांतील महान व्यक्तिमत्त्वांचा परिचय होतो आणि राज्याच्या वैभवाची जाणीव होते. त्यामुळे हे पुस्तक वाचल्याने ज्ञान, प्रेरणा आणि अभिमान या तिन्ही दृष्टीने सर्वांनाच फायदा होतो.या पुस्तकाला आदरणीय योगेश सोनवणे साहेब IT विभाग प्रमुख चे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी प्रस्तावना दिलेली आहे .माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे पुस्तक मला प्राप्त झाले आणि या पुस्तकाचे परीक्षण मला माझ्याच वाढदिवसा दिवशी करता आले .धन्यवाद बालाजी सर खूप छान अक्षर ठेवा आज माझ्या तुम्ही मला भेट दिला . त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार .सर्वांनी नक्की वाचावं असं हे सर्वांग सुंदर पुस्तक .
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment