वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- ११५
पुस्तकाचे नाव - आदर्श शिक्षण
लेखकाचे नाव - स्वामी विवेकानंद
प्रकाशन व आवृत्ती-स्वामी ब्रम्हस्थानंद नागपूर
पृष्ठे संख्या– १४५
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ 30
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
११५||पुस्तक परिचय
आदर्श शिक्षण
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद हे भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान आणि जागतिक विचारसरणीचे द्रष्टे महामानव होते. त्यांच्या विचारांनी शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. "आदर्श शिक्षण" हे पुस्तक म्हणजे त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचे संकलन आहे. हे पुस्तक वाचकाला केवळ शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण इतक्यापुरते मर्यादित न ठेवता, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठीचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहायला शिकवते.
स्वामी विवेकानंद म्हणतात:
"शिक्षण म्हणजे मनुष्याच्या अंगभूत शक्तींचा पूर्ण विकास होय."
त्यांच्या मते, बाह्य ज्ञान भरवण्यापेक्षा अंतर्गत शक्ती जागृत करणे हेच खरे शिक्षण.
उदाहरण:
एका विद्यार्थ्याला जर आत्मविश्वास, निर्णयक्षमता, धैर्य आणि नैतिक मूल्ये शिकवली गेली, तर तो जीवनात अधिक सक्षमपणे यशस्वी होऊ शकतो, हे स्वामीजींनी वारंवार सांगितले आहे.
विवेकानंद यांना गुरू रामकृष्ण परमहंस यांच्याकडून केवळ आध्यात्मिक नव्हे तर जीवनशैलीचे शिक्षण लाभले. ते म्हणतात,
"शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसून, आत्मा जागवणारा असावा."
उदाहरण:
स्वतः विवेकानंद हे गुरूच्या एका शब्दाने जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे उदाहरण आहेत.
शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल विकास हे खरे शिक्षण. ते म्हणतात,
"कमकुवतपणा हा पाप आहे."
उदाहरण:
ते विद्यार्थ्यांना व्यायाम, कुस्ती, खेळ यांचा आग्रह धरायचे, कारण शरीर मजबूत असेल तरच मनोबल वाढते.
ते म्हणतात की, शिक्षण आपल्या संस्कृतीशी जोडलेले असले पाहिजे. परकीय शिक्षणाची अंधानुकरण न करता भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण हेच उपयोगाचे आहे.
उदाहरण:
स्वामीजींनी वेद, उपनिषद, गीता, रामायण अशा ग्रंथांचा अभ्यास करून भारतीय विचारसरणीच्या आधारे शिक्षणदृष्टी मांडली.
स्वामी विवेकानंद म्हणतात:
"जर स्त्रीशक्तीला योग्य शिक्षण दिले, तर समाजाची प्रगती निश्चित आहे."
उदाहरण:
त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणसंस्था स्थापन कराव्यात, असा आग्रह रामकृष्ण मिशनकडून धरला.
आदर्श शिक्षण या पुस्तकामध्ये स्वामीजी आदर्श शिक्षण कसे असावे याची माहिती सांगतात. त्याबरोबरच शिक्षण प्राप्त करण्याची विविध उपाय शिक्षणाचा उद्देश नेमका कोणता आहे याचीही माहिती देतात. आजच्या शिक्षणातील दोष आणि त्या दोषांवर कोणती निवारण करायचे याचीही विस्तृत माहिती स्वामीजींनी या पुस्तकात अगदी सखोल दिली आहे .धार्मिक शिक्षणाची आवश्यकता आहे का याविषयी ते लिहितात .विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते कसे असावे विद्यार्थी कसे असावे शिक्षक कसे असावेत याची माहिती या प्रकरणातून त्यांनी छान दिली आहे .
स्त्री शिक्षण खरंच गरजेचे आहे का स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी आपले मोलाचे संदेश या पुस्तकात दिलेले आहेत खरोखरच स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे आणि हीच गरज त्यांनीही या पुस्तकातून मांडलेली आहे अमेरिकेतील स्त्रिया कशा आहेत याची माहिती दिलेली आहे वर्तमान आणि वैदिक काळात स्त्री-पुरुषात का भेद गेला हे त्यांनाही कळले नाही आदर्श सीतेचे चरित्र कसे आहे खरी शक्ती पूजा काय आहे याविषयी ती परखड माहिती देतात .या पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात सर्वसाधारण जनतेचे शिक्षण कसे होईल याविषयी ते लिहितात .
मातृभाषेतून शिक्षण हे त्यांनाही पटलेले आहे प्रचलित भाषेत शिक्षण द्या असे विचार ते मांडतात .
"आदर्श शिक्षण" हे केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर पालक, शिक्षक आणि शिक्षणधोरणकर्त्यांसाठी मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे. यातून व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीयता, नैतिकता आणि आध्यात्मिक उन्नती यांचे सुंदर चित्र उभे राहते.
अध्यापनापेक्षा आत्मोन्नतीचा मार्गच खरा शिक्षणाचा उद्देश आहे, असा संदेश हे पुस्तक देते.
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment