Sunday, June 29, 2025

पुस्तक क्रमांक 114 येते जगाया उभारी


 

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा

पुस्तक परिचय क्रमांक- ११४

पुस्तकाचे नाव - येते जगाया उभारी

लेखकाचे नाव - सचिन बेंडभर

प्रकाशन व आवृत्ती-यशोदीप पब्लिकेशन पुणे

पृष्ठे संख्या– १२०

किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १५०

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

११४||पुस्तक परिचय


येते जगाया उभारी

सचिन बेंडभर

सचिन बेंडभर सरांनी लिहिलेला "येते जगाया उभारी" हा कविता संग्रह म्हणजे सामान्य जीवनातील असामान्य भावभावनांचा, संघर्षाचा, आणि आशेच्या उमेदीचा एक झरझर वाहणारा प्रपात आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिली जाणारी उभारीची साद आहे.

या संग्रहातील कविता आपल्याला खचलेल्या क्षणांत जगण्यासाठी प्रेरणा देतात, अंधारातही आशेचा उजेड दाखवतात. शिक्षक म्हणून सरांचा अनुभव, ग्रामीण जीवनातील संघर्ष, विद्यार्थी आणि समाजातील संवेदना यांचा संगम त्यांच्या प्रत्येक ओळींतून जाणवतो.

सरांनी वापरलेली भाषा ही सुलभ, सरळ पण प्रभावशाली आहे. त्या ओळी थेट हृदयात जाऊन बसतात. "येते जगाया उभारी" या शीर्षकातूनच त्यांच्या लेखणीचा आशावादी दृष्टिकोन जाणवतो.

"येते जगाया उभारी" म्हणजे जीवनाच्या प्रत्येक पडझडीला उत्तर देणारी, पुन्हा उभं राहण्याची हिंमत देणारी कवितांची शिदोरी आहे. सचिन बेंडभर सरांनी आपल्या प्रतिभेच्या ज्योतीने हा संग्रह उजळून टाकला आहे.


– हे पुस्तक म्हणजे शब्दांनी दिलेली उभारी आहे… जीवनाला भिडण्याची नवी तयारी आहे…


मातीशी नाळ जोडणारा हा कविता संग्रह आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच मातीत राबणाऱ्या हातांना समर्पित आहे. येते जगाया उभारी हा सचिन बेंडभर सरांचा तिसरा काव्यसंग्रह आहे . त्यांच्या लेखनात कायम सातत्य आहे .हे हे पुस्तक प्रकाशित झाले तोपर्यंत त्यांनी जवळपास 30 पुस्तकांच्या टप्पा पार केलेला होता.बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात कळो निसर्ग मानवा या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे .

आपल्या पहिल्याच कवितेत ते म्हणतात ,

शीळ वाजवितो वारा 

पक्षी कुजनाते करी 

अर्धपोटी कष्टातही 

येते जगाया उभारी ।।

या काव्यसंग्रहाचे शीर्षक येथे जागा उभारी का दिले असेल हे पंक्तीवरून सहज समजून येते .

सृष्टीची नवलाई या कवितेत बेंडभर सर सृष्टीतील अनोखे आणि नवख्या गोष्टींचे वर्णन करताना म्हणतात,

आता वाढेल रोपटे 

उद्या धरील पोटरा 

कणसावरी सोनसळी

 मग डोलेल फुलोरा ।।


अशी अद्भुत किमया

 कशी केली हो देवाने

 सोनियाच्या कोंदणात 

शुभ्र मोतीयाचे दाणे ।।

"सेवा धरतीची करू" या कवितेत ते म्हणतात,

आपण निसर्गाच्या ऋणात आहोत. ही धरती आपल्याला अन्न, पाणी, हवा, आश्रय अशा अनमोल गोष्टी निरंतर देत असते. तिचं संरक्षण, संवर्धन आणि सेवा करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे.

कवी या कवितेतून सांगतो की,

आपण धरतीच्या ऋणात आहोत, म्हणून आपलं जीवन तीची सेवा करण्यासाठी समर्पित असावं.

वृक्षारोपण, पाण्याची बचत, मातीचं संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक जीवनशैली हीच खरी सेवा आहे.

ही कविता केवळ एक सन्देश नव्हे, तर निसर्गाशी असलेलं आपलं नातं समजून घेण्याची आणि तिच्यासाठी काही करण्याची साद आहे.

शेवटी, धरतीचं रक्षण केल्यानेच मानवाचं रक्षण होतं — हाच या कवितेचा गाभा आहे.

बाप माझा शेतकरी या कवितेत सर आपल्या पित्याचे सुंदर वर्णन करतात .

बाप माझा वारकरी, त्याची शेतात पंढरी 

वारासुद्धा राही उभा, त्याची ऐकाया भल्लरी।।१।।


नसे अक्षरओळख, त्यासी शिकविले कोणी ?

 दिसभर आनंदाने, गातो मोटेवर गाणी।।२।।

येते जगाया उभारी" हा शेतीविषयक माहिती देणाऱ्या कवितांचा एक सुंदर संग्रह आहे. या संग्रहात आधुनिक शेती, शेतकऱ्यांचे जीवन, नैसर्गिक संकटे, कृषितंत्रज्ञान, बियाणं, खतं, शेतीतील नवे प्रयोग, शेतीप्रधान अर्थव्यवस्था यासारख्या विविध विषयांवर आधारित कवितांचा समावेश आहे.


या कवितांमधून शेतकऱ्यांची आशा, मेहनत, दु:खं, आणि नव्या युगातील बदलांची उभारी प्रकट होते.

"येते जगाया उभारी" या शीर्षकातच आशय दडलेला आहे – शेतकऱ्याच्या जगण्याला, शेतीच्या क्षेत्राला नव्याने उभारी देणारा हा काव्यसंग्रह आहे.

सर्वांनी संग्रही ठेवावा आणि वाचावा असा हा सुंदर काव्यसंग्रह .सचिन बेंडभर सरांचा लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा✒️💐🎊🎉

धन्यवाद .


☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

          

सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )

मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:

Post a Comment