वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १०६
पुस्तकाचे नाव - माझ्या स्वप्नातील भारत
लेखकाचे नाव - डॉक्टर ए .पी .जे अब्दुल कलाम ए शिवाथानु पिल्ले
अनुवाद चंद्रशेखर मुरगुडकर
प्रकाशन व आवृत्ती-चिनार पब्लिशर्स पुणे चौथी आवृत्ती
पृष्ठे संख्या– २५१
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ २५०
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१०६||पुस्तक परिचय
माझ्या स्वप्नातील भारत
डॉक्टर ए .पी .जे अब्दुल कलाम ए शिवाथानु पिल्ले
अनुवाद चंद्रशेखर मुरगुडकर
माझ्या स्वप्नातील भारत" (My Vision for India) हे पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि ए. शिवाथानु पिल्लै यांनी लिहिले असून अनुवाद चंद्रशेखर मुरगुडकर यांनी मराठीत केला आहे. हे पुस्तक भारताच्या भविष्याबाबतची एक प्रेरणादायी आणि दूरदृष्टीपूर्ण मांडणी आहे.
हे पुस्तक भारत एक महासत्ता कसा बनू शकतो? यावर लक्ष केंद्रित करतं. डॉ. कलाम यांनी आपली दूरदृष्टी आणि विज्ञानाचा वापर करून भारताचं भविष्य कसं उज्ज्वल होऊ शकतं, हे अतिशय प्रेरणादायी शैलीत मांडलं आहे.
या पुस्तकातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
भारताच्या समृद्धीचे स्वप्न:
डॉ. कलाम भारताला 2020 पर्यंत विकसित देश बनवण्याचं स्वप्न पाहतात.
ते विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आणि नैतिक मूल्यांच्या आधारे विकासाचा मार्ग दाखवतात.
सामर्थ्यशाली तरुण वर्ग:
भारताच्या तरुण पिढीकडे प्रचंड क्षमता आहे, ती योग्य दिशेने वापरल्यास देशाचा कायापालट होऊ शकतो.
तंत्रज्ञानाचा वापर:
ग्रामीण भारतात तंत्रज्ञान पोहोचवण्याचा आग्रह.
माहिती तंत्रज्ञान, अंतराळविज्ञान, संरक्षण संशोधन यांचा विकास.
राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यभावना:
केवळ हक्क नव्हे तर प्रत्येक नागरिकाने कर्तव्य निभावणं गरजेचं आहे.
शिक्षण आणि आत्मशक्तीकरणावर भर.
महान भारताची संकल्पना:
आत्मनिर्भर, सुरक्षित, समृद्ध, आणि नैतिक मूल्यांनी परिपूर्ण भारत.
हे पुस्तक वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेले असून सर्वसामान्य नागरिकालाही ते समजेल अशा सोप्या भाषेत आहे.
वाचकांमध्ये देशाभिमान आणि कर्तृत्वाची प्रेरणा जागवते.
विद्यार्थ्यांना आणि युवकांना दिशा देणारे हे एक दिशादर्शक पुस्तक आहे.
या पुस्तकातून ते आपल्या मनोगत म्हणतात,
मोहीम' या संकल्पनेत बसणारे अनेक यशस्वी कार्यक्रम राबवण्याचा सिद्ध अनुभव भारताकडे आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व आपण पुरेपूर जाणले आहे. शिवाय, 'मोहीम' कार्यक्रम राबवताना, आवश्यक असणारी धोरणं तयार करताना तंत्रज्ञानाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची देखील कल्पना आपल्याला आहे. कालमानाला आवश्यक अशी सोयीची परिस्थिती निर्माण करणे, भारताला ज्ञानाधिष्ठित समाज या नात्याने पुढे आणणे, ही आजच्या काळाची खरी गरज आहे. तरुणांमधली आणि साधनसंपत्तीच्या उपलब्ध स्त्रोतांमधली अंतर्गत शक्ती सुयोग्य तन्हेने वापरात आणणे, यासाठी कल्पक नेतृत्त्व महत्त्वाचे ठरते. विचारांचे जाळे व्यवस्थितपणे विणून, भारताला विकसित देशात रूपांतरित करण्यासाठी एक अब्ज नागरिकांची ताकद पणाला लावणे ही आजची अत्यंत तातडीची गरज आहे.
अतिशय मोलाचे आणि मार्मिक विचार या पुस्तकात मांडलेले आहेत .
या पुस्तकाचे अनुवाद करणारे मुरुगुडकर आपल्या मनोगत म्हणतात,
विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठीची त्यांच्या मनातली आंतरिक तळमळ
सतत आणि स्पष्टपणे जाणवत राहिली. त्या कळकळीमागचं केवळ राष्ट्रकल्याणाच्या विचारांनी भारलेलं डॉ. कलाम यांचं स्वच्छ व पारदर्शक मन वाचकाला जाणवेल यात शंकाच नाही. त्याचा मान आपण ठेवला पाहिजे. डॉ. कलाम यांच्यासारखा माणूस ज्या दिवशी या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला त्या दिवशी या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या समृद्धीची बीजे रोवली गेली, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. अनुवाद करताना माझं स्वतःचं मन प्रज्वलित झालं आहे. सर्व वाचकांचेही होवो आणि डॉ. कलामांच्या मनातलं विकसित भारताचं स्वप्न साकार होवो हीच मनोमन इच्छा !
खरोखर सर्व जनतेचे हेच म्हणणं आहे की डॉक्टरांच्या मनातील विकसित भारत लवकरात लवकर साक्षात येऊन आणि आपले भारत मातेचा असाच उत्तरोत्तर विकास होत राहो .
डॉक्टर कलाम या पुस्तकातून खूप छान संदेश सर्वांना देतात.
"स्वप्न तेच खरी, जी तुम्हाला झोपू देत नाहीत."
➡️ डॉ. कलाम म्हणतात की फक्त डोळे उघडे ठेवून पाहिलेली स्वप्नं नाहीत तर जी तुम्हाला काम करण्यासाठी प्रेरित करतात, तीच खरी स्वप्नं असतात.
"देश बदलायचा असेल, तर आपण स्वतः बदलायला हवे."
➡️ प्रत्येक नागरिकाने देशासाठी काहीतरी योगदान देणे हेच राष्ट्रसेवा आहे.
जर आपण आज वाचलो, शिकलो आणि विचार केला, तर उद्याचं भारत घडवू शकतो."
"भारताचं भविष्य हे त्याच्या गावांमध्ये लपलेलं आहे."
एवढे सुंदर संदेश डॉक्टर कलाम आपल्या सर्वांना देतात. त्यांची सर्वच पुस्तके हे प्रेरणादायी आणि आनंद देणारी आहेत .
“स्वप्न तेच खरी, जी तुम्हाला झोपू देत नाहीत.”
ही प्रेरणादायी ओळ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारसंपदेचं सार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे डॉ. कलाम हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर एक स्वप्नवत राष्ट्राचा विचार करणारे दूरदृष्टी असलेले देशभक्त होते. त्यांनी "माझ्या स्वप्नातील भारत" या पुस्तकात २१व्या शतकातील सक्षम, सुरक्षित आणि विकसित भारताची रूपरेषा मांडली आहे.
या पुस्तकात डॉ. कलाम आणि डॉ. ए. शिवाथानु पिल्लै यांनी विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, संरक्षण, नैतिकता आणि तरुणांची ऊर्जा यांच्या आधारे भारत कसा महासत्ता होऊ शकतो, हे स्पष्ट केले आहे. हे पुस्तक केवळ विचार नाही, तर कृतीची दिशा दर्शवते.
या पुस्तकातील प्रत्येक पानावरून डॉ. कलाम यांची भारतासाठीची तळमळ स्पष्ट होते. त्यांनी लिहिलं आहे, “जर प्रत्येक भारतीय आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल, तर भारत महासत्ता होणारच!”
या विचारांमधून प्रत्येकाला एक नवी दिशा आणि ऊर्जा मिळते.
"माझ्या स्वप्नातील भारत" हे केवळ एक पुस्तक नाही, तर भारतीय जनतेला उद्देशून दिलेले आवाहन आहे. हे पुस्तक वाचताना प्रत्येक वाचकाला वाटते की “मीही या राष्ट्रनिर्माणात हातभार लावला पाहिजे.”
डॉ. कलाम यांचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार केल्यास, तो दिवस दूर नाही, की आपला भारत खरोखरच एक महान, विकसित आणि आदर्श राष्ट्र म्हणून ओळखला जाईल.
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment