वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १०५
पुस्तकाचे नाव - राष्ट्रमाता अहिल्या
लेखकाचे नाव - मा. राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर
प्रकाशन व आवृत्ती- काव्यमित्र प्रकाशन पुणे
पृष्ठे संख्या– ४१
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१०५||पुस्तक परिचय
राष्ट्रमाता अहिल्या
मा.राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर
राष्ट्रमाता अहिल्या" हे पुस्तक अहिल्याबाई होळकर यांच्या महान कार्याचा आणि तेजस्वी जीवनप्रवासाचा विस्तृत आलेख मांडणारे एक प्रेरणादायी साहित्य आहे. लेखक राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर यांनी हे पुस्तक खूप छानरीत्या मांडलेले आहे.हे पुस्तक महाराष्ट्रात विशेषतः इतिहास, संस्कृती आणि नारीशक्ती याबद्दल रुची असलेल्या वाचकांसाठी महत्त्वाचे मानले जाते.
अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास:
जन्म: 31 मे 1725, चौंडी (जि. अहमदनगर)
वडील: माणकोजी शिंदे (एक साधा शेतकरी)
लग्न: मल्हारराव होळकर यांच्या पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी
पती व पुत्राच्या निधनानंतर: अहिल्याबाईंनी स्वतः कारभार हाती घेतला आणि एक न्यायप्रिय, जनकल्याणकारी, भक्तिपरायण आणि कुशल प्रशासिका म्हणून लौकिक मिळवला.
या पुस्तकात पुढील माहिती दिलेली आहे .
बालपण व संस्कार: ग्रामीण वातावरण, शिक्षण, धार्मिकता
कठीण प्रसंगांतील धैर्य: पती, सासरे आणि पुत्र गमावल्यावरही त्यांनी पत्थराचे मन न बनवता प्रजेसाठी मातेचे हृदय दाखवले.
राजकारण आणि न्याय: त्यांनी मुलकी कारभार योग्य रीतीने चालवला, शिस्तबद्ध प्रशासन दिले.
धार्मिक व सामाजिक कार्य: काशी, गंगा घाट, रामेश्वर, सोमनाथ, जगन्नाथ यांसारख्या अनेक धार्मिक स्थळांचे जीर्णोद्धार, धर्मशाळा, विहिरी, घाट, मंदिरांची उभारणी.
स्त्रीशक्तीचा आदर्श: त्यांची कार्यशैली, सहनशीलता, धैर्य हे स्त्रियांना आदर्श ठरतात.
खंडेराव आणि पुढे मल्हारराव यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई अत्यंत दुःखात होत्या. त्यांनी राज्यसत्ता स्वीकारण्यास सुरुवातीला नकार दिला. पण प्रजेच्या आग्रहावर, आणि सल्लागारांच्या विनंतीवर त्यांनी राज्यकारभार स्वीकारला.
प्रेरणा: दुःख कितीही मोठं असलं, तरी जबाबदारीपासून पळ काढायचा नसतो. संकटे आली की आपली भूमिका अधिक सशक्त बनवावी लागते.
एकदा त्यांच्या राज्यातल्या एका सरदाराचा मुलगा गुन्हेगारी कृत्यात दोषी आढळला. कोणीही त्याला शिक्षा होऊ नये म्हणून हस्तक्षेप केला नाही. अहिल्याबाईंनी स्पष्ट सांगितले की – "न्याय सर्वांसाठी सारखाच असतो, मग तो राजा असो की प्रजाजन."
प्रेरणा: न्याय देताना भेदभाव नको, सर्वांना समान वागणूक द्यावी.
एकदा त्यांच्या राज्यातल्या एका सरदाराचा मुलगा गुन्हेगारी कृत्यात दोषी आढळला. कोणीही त्याला शिक्षा होऊ नये म्हणून हस्तक्षेप केला नाही. अहिल्याबाईंनी स्पष्ट सांगितले की – "न्याय सर्वांसाठी सारखाच असतो, मग तो राजा असो की प्रजाजन."
प्रेरणा: न्याय देताना भेदभाव नको, सर्वांना समान वागणूक द्यावी.
अहिल्याबाईंनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र बाजार उभारले, जे त्याकाळात खूपच पुढारलेलं पाऊल होतं.
जरी त्या राणी होत्या, तरी अहिल्याबाई साधा पोशाख करत, आणि गरजूंसोबत वावरण्यास अजिबात संकोच करत नसत. त्यांचा जीवनशैली अत्यंत नम्र आणि सेवाभावी होती.
राष्ट्रमाता अहिल्या" हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आहे. हे पुस्तक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, जीवनमूल्यांचा, शौर्याचा आणि न्यायप्रियतेचा ठसा उमटवते.
अहिल्याबाईंचे जीवन म्हणजे संयम, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि प्रजासत्ताक नेतृत्व यांचे आदर्श उदाहरण आहे. हे पुस्तक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण दर्शन घडवते.
अहिल्याबाईंचे जीवन हे एक झळाळते दीपस्तंभ आहे – ज्यातून आपण स्त्रीशक्ती, कर्तव्यभावना, न्याय, धर्मनिष्ठा, आणि सेवाभाव शिकू शकतो.
लेखक सगर म्हणतात की ,
शिवरायांचे प्रजावात्सल्य व बुद्धाची करूणा ज्या व्यक्तीत एकत्रित सामावलेल्या होत्या, त्या अहिल्यादेवी होळकर हीच भारतीय दर्शनांची सर्वांगीण ओळख आहे. एवढे अफाट व चिरस्थायी काम अहिल्यादेवींच्या हातून झालेले आहे.
अशा या थोर राज्यकर्त्या लोकमाता राजमाता अहिल्यादेवींवर परदेशी लेखक-लेखिका व कवींनी विपुल लेखन इंग्रजी-फ्रेंच भाषांमधून केलेले आहे. स्कॉटलँडमधील कवयित्री जोना बेली यांनी दीर्घ काव्य रचले आहे. त्यातील चार ओळी अशा आहेत.
'Fo Thirty Years Her Reign of Peace The Land in Blessings Did Increase ! And She was Blessed by Every Tongue.... By Stern And Gentle: Old and Young!"
पॉलिटिकल एजंड सर जॉन माल्कम, व्हाईसरॉय लॉर्ड एलनबरो यांनी अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराबद्दल अत्यंत प्रशंसनीय लिखाण केलेले आहे. मोरोपंतांनी आपली सारी काव्यप्रतिभा अहिल्यादेवींच्या चरणी अर्पण केली होती.
अहिल्यादेवी होळकर या जगाला एक उत्तम प्रशासक, एक प्रजावत्सल लोकमाता, एक आदर्श राज्यकर्त्या, एक मराठेशाहीतील सुवर्णकाळाच्या निर्मात्या, एक स्त्रीत्वाचे जोखड झुगारून देऊन प्रचंड त्याग वा विश्वासाने राज्यकर्त्या म्हणून शिस्तप्रिय शासक, एक सामान्य लोकांच्या भाव-भावनांचा मानसन्मान करणारी राज्यकर्ता..... अशा अनेक अंगांनी माहीत आहेत. राज्यकर्त्यांची ओळख जगभर त्यांच्या कार्यामुळेच होत असते. तशी ओळख आजही अहिल्यादेवींची सर्वदूर आहेच; परंतु आमच्या देशातील इतिहासकार, चरित्रकार, चित्रकार, कलाकार, चित्रपट निर्माते, नाट्यनिर्माते इत्यादींनी आपल्या प्रतिभांचा वापर करून या महान लोकमाताविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केलेली नाही, हा कृतघ्नपणा आहे. लोकमाता अहिल्यादेवींच्या आपल्या जीवनात या सर्व लोकांसाठी केलेले लोककार्य आजही इतिहासाच्या पानापानावर परदेशी इतिहासकरांनी नोंदवलेले आहेच. याशिवाय होळकर संस्थानासह सर्वच देशात आजही खूणा, वस्तू, वास्तू, चित्र, पद्य, काव्य इत्यादी रूपाने शिल्लक आहे. अशा या महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे महानिर्वाण महेश्वर (मध्यप्रदेश) येथे दि. १३ ऑगस्ट १७९५ रोजी झाला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतवर्ष हळहळला. जय मल्हार !!
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

No comments:
Post a Comment