वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२१
पुस्तकाचे नांव- सावित्रीबाई फुले
लेखकाचे नांव- जी. ए.उगले
प्रकाशन व आवृत्ती- साकेत प्रकाशन , औरंगाबाद,पाचवी आवृत्ती २०१८
पृष्ठे संख्या– ११२
किंमत /स्वागत मूल्य-- १२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१||पुस्तक परिचय
सावित्रीबाई फुले
लेखक / संकलक - जी. ए.उगले
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो . समस्त स्त्री वर्गासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे ज्या ठिकाणी या ज्योतीचा जन्म झाला त्याच ठिकाणी आम्ही या शिक्षण क्षेत्रात येऊन कर्तव्य बजावत आहोत याहून सुवर्णक्षण तो काय .
नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे या ज्योतीचा जन्म झाला आणि ही अखंड ज्योत समस्त स्रीवर्गाच्या आयुष्यात ज्ञान ज्योत बनून आली . आमच्या आयुष्यातला अंधकार नष्ट झाला .
परीक्षण करावा असा माझा खूप दिवसांचा मानस होता तो आज पूर्ण झाला साकेत प्रकाशन यांच्याकडून प्रकाशित झालेले सावित्रीबाई फुले यांची उगले यांनी लिहिलेले असे सुंदर पुस्तक माझ्या हाती पडलं .यामध्ये उगले यांनी सावित्रीबाई फुले जीवनदर्शन सामाजिक कार्य सावित्रीबाईंची भाषण संपदा सावित्रीबाईंचा पत्र व्यवहार सावित्रीबाईंची काव्य संपदा सावित्रीबाई आणि सत्यशोधक समाज लहान पोरांचे शब्दात सावित्री दर्शन सावित्रीबाई फुले एक मुक्त चिंतन आणि सगळ्यात शेवटी या पुस्तकाला जी काही मदत लागेल त्या पुस्तकांची संदर्भसूची दिलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी खंडोजी नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी आपल्या सावित्रीबाईंचा जन्म झाला . त्यांना चार अपत्ये होती आणि सगळ्यात थोरला अपत्य सावित्रीबाई होते . घरातूनच त्यांना आचार विचाराची सुंदर अशी संस्कार मिळालेले होते, अशा संस्कारातच मोठ्या होत होत त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आणि एका नवीन पर्वाला सुरुवात झाली त्यावेळेस कोणाला माहीत होतं या दोघांकडून एक असं काहीतरी कार्य घडेल साऱ्या महिला जातीला प्रेरक ठरेल. सावित्रीबाईंचं खरं कार्य जर जवळून पाहायचं असेल तर नक्कीच या पुस्तकाचे वाचन करणे खूप गरजेचे आहे आणि सूक्ष्म अशी माहिती या पुस्तकात दिलेली आहे.
प्ले रोगाच्या साथीत तर त्यांनी आपल्या जीवाची ही परवा न करता समाजाची सेवा करून एक आदर्श सर्वांसमोर घालून दिला . म्हणूनच समस्त स्त्री वर्गाच्या त्या एक आदर्श आहेत. बालहत्या प्रतिबंध असू द्या विधवा पुनर्विवाह असू द्या दत्तक पालक असू द्या प्रत्येक क्षेत्रात सावित्रीबाईंनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे . मुलींचे शिक्षणासाठी तर त्यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केले .खरोखरच सावित्रीबाई तुम्ही होता म्हणून आज आम्ही लिहू शकतो बोलू शकतो.
सावित्रीबाई फुले यांची भाषण कला ही अतिशय समृद्ध होती. आपल्या भाषणातून त्यांनी नव विचारांची ज्योत जागविली.
याशिवाय सावित्रीबाई फुले या उत्तम कवयित्री होत्या. त्यांचा काव्य फुले हा कवितासंग्रह यातून त्या आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात.
सावित्रीबाई फुले यांचे जीवन चिकाटी आणि समर्पण शक्तीचे उदाहरण देते. तिची कथा आपल्याला अडथळे असतानाही न्यायासाठी झटण्यास प्रवृत्त करते. आपल्या स्वतःच्या जीवनात तिची ताकद आणि लवचिकता अनुकरण करून आपण तिची आठवण ठेवूया.
अखेरीस, सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण, सामाजिक बदल आणि स्त्रीवादातील योगदान, तसेच त्यांच्या धैर्य आणि दृढतेचे व्यक्तिमत्त्व, त्यांना भारतीय इतिहासातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व बनवले. चला तिच्या वारशाचे स्मरण करूया आणि अधिक न्याय आणि न्याय समाजाची तिची दृष्टी जिवंत ठेवण्यासाठी कार्य करूया.
माझ्या साऊ विषयी लिहील तेवढे कमीच आहे .माझी लेखणी देखील अपुरी पडेल एवढ मोठं कार्य समस्त स्त्री वर्गासाठी या दोघांनी करून ठेवल आहे. लेखकाने या पुस्तकात सावित्रीबाई फुले विषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .नक्कीच हे पुस्तक वाचल्याने पुन्हा सर्व इतिहास डोळ्यासमोर जागा होतो. आदरणीय उगले सरांच्या लेखणीला सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
सो अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा .

No comments:
Post a Comment