वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-१८
पुस्तकाचे नांव- शुभकुंभ
लेखकाचे नांव- सौ शुभांगी तानाजी कुंभार
प्रकाशन व आवृत्ती- पहिली विद्यार्थी निष्ठा प्रकाशन ,सातारा,प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या– ५४
किंमत /स्वागत मूल्य-- ७५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८||पुस्तक परिचय
शुभकुंभ
लेखक / संकलक - सौ. शुभांगी तानाजी कुंभार
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
माझी मैत्रीण शुभांगी कुंभार हिचा हा पहिलाच काव्यसंग्रह शुभ कुंभ यामध्ये तिच्या काही कविता आणि चार अक्षरी आहेत विशेष म्हणजे तिचं कराव एवढं कौतुक कमी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस तिने याच पुस्तकांनी आपल्या आदरणीय सासऱ्यांचे ग्रंथ तुला करून त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात आणि उत्साह साजरा केला खरोखरच सासऱ्याच आणि सुनेच असं नातं हल्लीच्या जमान्यात पाहायला मिळणार नाही म्हणजे दुर्मिळच. माझ्या मैत्रिणीचा कराव एवढं कौतुक कमीच आहे. नुकतीच तिनं ज्ञानरचनावादात पीएचडी पूर्ण केली . याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन तिला गौरवलं गेलं . कुणालाही अभिमान वाटावा अशी ही माझी मैत्रीण आणि तिचाच हा शुभ कुंभ हा पहिला काव्यसंग्रह . परीक्षणाच्या रूपाने तुम्हा सर्वांसमोर ठेवताना मला अत्यानंद होत आहे .या पुस्तकाला अतिशय समर्पक नाव दिलेले आहे .शुभांगी कुंभार यांनी शुभांगी मधल्या शुभ आणि कुंभार मधला कुंभ घेऊन शुभ कुंभ हा कवितासंग्रह तिच्या या सुंदर लेखणीतून साकारला आहे .खरोखरच हा शुभकुंभ अनेक यशस्वी पायऱ्यांचे मुहूर्तमेढ रोवणाराच झाला आहे .
या पुस्तकाच्या मनोगतात लिहिताना शुभांगी कुंभार मॅडम म्हणतात कुंभ म्हणजे घडा घडा हा नेहमी दुसऱ्याची सुधा भागवण्याचे काम करतो तसाच हा शुभकुंभ जीवनातील सार , आनंद, हर्ष, प्रेम , आईचे वात्सल्य, वडिलांची श्रमप्रतिष्ठा आणि शालेय आठवणीनी ओतप्रोत भरलेला आहे.
या पुस्तकाचे अर्पण पत्र तिने आपल्या सासुबाईंच्या नावे केलेल्या आहे . खरोखरच अशी सून मिळायला खूप मोठ भाग्य लागतं. अनेकांनी तिच्या या पुस्तकाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत.
कदाचित माझ्या शब्दांची ओंजळ तिचं कौतुक करायला कमी पडेल असं वाटते.
या कवितासंग्रहात एकूण 52 कविता आणि चार अक्षरी तिने लिहीलेले आहेत म्हणजे साक्षात बावन्नकशी सोनचं माझ्या हातात या कवितासंग्रहाचे रूपाने पडलेल आहे.
गणपती ,शुभ कुंभ ,राजमाता जिजाऊ ,कर्मवीर , फेडूया ऋण भारत मातेचे ,माय मराठी, महामानव ,आई ,बाप ,हिरकणी माझा महाराष्ट्र, सातारा, बालकविता, पांडुरंग ,सहा ऋतू, शब्दकोडे, चार अवस्था, मिसळ पार्टी ,उन्हाळी पाऊस ,बापू आणि क्षण निरोपाचा अशा कितीतरी कविता तीन आपल्या शब्दात लिलया रेखाटल्या आहेत.
अमृत कुंभ हे आपल्या कवितेत ते अतिशय सुंदर रित्या आपल्या कुटुंबीयांबद्दल लिहिते
एक कुंभ भरला मी अमृताने
विविध विषयांनी फुलला विचाराने
जन्माची शिदोरी दिली माऊलीने
आयुष्याचे सोने झाले तिच्या सावलीने
बाप माझा कष्टाळू प्रामाणिक किती
माती तुझ्यापुढे आकाराने रुपे घेती
नवरा माझा तानाजी आहे मनाचा दिलदार
संसाराची वाट पेलती आम्ही दिमाखदार
खूप सुंदर असे शब्दातील हे वर्णन केलेले आहे.
आपल्या आयुष्य या कवितेत ती म्हणते,
सारे छंद ते जोपासा
जीवनाचा हाच वसा
कर्म करा निरपेक्ष
मिळे यश,वेळ साक्ष
अशा सुंदर शब्दातील आयुष्य आपल्या लेखणीतून रेखाटल आहे .अजूनही ते धडपडते आहे लिहिते आहे प्रत्येक आयुष्यातील संघर्षाला सामोरे जाऊन आपल्या यशाची पाऊले उमटवत आहे. अशीच तुझी लेखणी सदैव तळपत राहो या मनोमन शुभेच्छा. आज तुझ्या नोकरीला 19 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणूनच तुला शुभेच्छा देण्यासाठी मी तुझ्या काव्यसंग्रहाचे परीक्षण केलेले आहे. तेव्हा सगळ्यांनी नक्की वाचा अतिशय सुंदर आणि वाचनीय असा हा कवितासंग्रह आहे.
सौ.अंजली शशिकांत गोडसे (शिर्के) मर्ढे सातारा .


No comments:
Post a Comment