वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक- १२६
पुस्तकाचे नाव - हृदयातील तुफान
लेखकाचे नाव - भगवान विशे
प्रकाशन व आवृत्ती- प्रभात प्रकाशन मुगांव ठाणे
पृष्ठे संख्या– १८०
किंमत /स्वागत मूल्य-- ₹ १००
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१२ ६||पुस्तक परिचय
हृदयातील तुफान
भगवान विशे
कविता म्हणजे मानवी मनाच्या गाभ्यात दडलेले भावविश्व. त्या भावविश्वाला शब्दांचे कोंदण चढवून जेव्हा कवी आपले मनोगत व्यक्त करतो, तेव्हा वाचकांच्या अंतःकरणालाही नवा स्पर्श मिळतो. भगवान विशे यांचा हृदयातील तुफान हा कवितासंग्रह याच भावनांचा साक्षीदार आहे.
विषयवैविध्य व सामाजिक भान
या संग्रहात हृदयातील तुफान, जीवन, गुन्हेगार माणूस, आई, मी एकटा, चिमणी, पाखरांनो, धर्म, मैत्री, भारतीय जीवन, अस्तित्व, संघर्ष अशा विविध विषयांवरील कविता वाचकांसमोर येतात.
दुःख संपेल या जगातलं, पण संघर्ष संपणार नाही
माणूस संपेल जगण्यातला, पण जीवन संपणार नाही.
असे ते आपल्या कवितेतून जीवनाचे मर्म सांगतात .
"जीवन" आणि "अस्तित्व" या कवितांमधून मानवी प्रवासातील कडू-गोड अनुभवांचा आढावा मिळतो.
"आई" या कवितेतून मातृमूल्यांची ओंजळ भरून कवीने हृदय पाझरवले आहे.
आई ! चरणस्पर्श करुनी
आर्पितो तुला हे 'हृदयातील तुफान' फुलवून टाकून मनातील कविता
आई दे मला! तुझाच आशीर्वाद !
आई विषयी अपार प्रेम यातून व्यक्त होते .
"मी एकटा" या कवितेत व्यक्तीच्या एकटेपणाचा, तुटलेपणाचा वेध घेतला आहे.
"धर्म" आणि "मैत्री" या कवितांतून सामाजिक ऐक्य, मानवी नात्यांची खरी उब जाणवते.
सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब
संग्रहातील माझ्या देशात, कथा एका मुलाची, हुंडाबळी, प्राणी प्रश्न, जवान या कविता थेट वास्तवाशी निगडित आहेत.
"हुंडाबळी" या कवितेत समाजातील क्रूर प्रथा आणि त्यातून होणाऱ्या शोकांतिकेचे दर्शन घडते.
"जवान" या कवितेत सीमारेषेवर उभा असलेला सैनिक आणि त्याच्या बलिदानाची जाणीव मनाला भिडते.
"कथा एका मुलाची" आणि "प्राणी प्रश्न" या कवितांतून समाजातील असमानता, अन्याय आणि संवेदनशीलतेचा वेध घेतला आहे.
निसर्ग व संवेदनशीलता
चिमणी, पाखरांनो, वृक्षाचे मनोगत या कवितांमधून कवीने निसर्गाशी संवाद साधला आहे. वृक्षाचे आत्मकथन, चिमणीच्या उडाणीत दडलेले स्वातंत्र्य, पाखरांच्या गजरातील आनंद या सर्वांतून निसर्गाचे जिवंत चित्रण जाणवते.
व्यक्ती व समाज यांचे अंतरंग
भारतीय श्रीमंत, चार सुपुत्र, प्राथमिक शिक्षक अशा कवितांमधून कवीने समाजातील विविध घटकांचा अभ्यास साकारला आहे.
"भारतीय श्रीमंत" या कवितेत संपत्तीच्या विषमतेवर रोखठोक भाष्य केले आहे.
"प्राथमिक शिक्षक" या कवितेत शिक्षकाचे कर्तृत्व, संघर्ष आणि समाजातील स्थान अधोरेखित केले आहे.
"चार सुपुत्र" या कवितेत कौटुंबिक आयुष्याच्या जडणघडणीतील वास्तव प्रतिबिंबित होते.
चारोळ्यांचा खास ठेवा
संग्रहाच्या शेवटी दिलेल्या चारोळ्या कवीच्या सहज भावनांचे प्रकटीकरण आहेत. लहानशा ओळींतून मोठा संदेश पोहोचवण्याचे सामर्थ्य या चारोळ्यांमध्ये आहे.
कृतज्ञतेची भावना
ज्यांनी या कवितासंग्रह निर्मितीत, प्रकाशनात आणि प्रेरणेत विशेष सहकार्य केले, त्यांचे कवीने शेवटच्या काही पानांवर मनःपूर्वक आभार मानले आहेत. हे त्यांच्या नम्रतेचे व मनःस्वच्छतेचे द्योतक आहे.
एकूणच
हृदयातील तुफान हा संग्रह केवळ कवितांचा नव्हे तर विचारांचा, भावना-आवेगांचा आणि समाजाशी जोडलेल्या संवेदनांचा संगम आहे. कवीच्या अंतःकरणातून उमटणाऱ्या भावलहरी वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचतात आणि त्यालाही विचारप्रवृत्त करतात. हा संग्रह म्हणजे मनाला भिडणारा, अंतर्मुख करणारा आणि समाजाला आरसा दाखवणारा ठेवा आहे.
आदरणीय भगवान विशे यांच्या लेखणीला उत्तरोत्तर बळ येवो ! त्यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा ..
धन्यवाद .
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
सौ . अंजली शशिकांत गोडसे (शिर्के )
मु.पो मर्ढे ता . जि सातारा

अंतर्मनाचा ठाव घेणारे 'हृदयातील तुफान' हा कविता संग्रह कवी भगवान विशे यांच्यातील प्रतिभेचे देणं आहे.
ReplyDeleteवाचनीय आणि स्पृहनीय!
खूप छान कवितासंग्रह आहे...मित्रवर्य विशे सर यांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....
ReplyDeleteविशेष म्हणजे भगवान विशे यांनी हा काव्यसंग्रह कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्रसिद्ध केला आहे,कविता कुमार वयात लिहूनही प्रगल्भ आहेत
ReplyDeleteखूपच छान असा कविता संग्रह आहे....आमचे सोयरे श्री. भगवान विशे सर यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आणी उदात्त विचारसरणीचा जणू संगमच! देव त्यांना उत्तरोत्तर लिहण्याची प्रेरणा देवो अशी श्री गणेश चरणी प्रार्थना. 🙏
ReplyDeleteसुंदर समीक्षण
ReplyDeleteलेखनकार्यासाठी सरांना शुभेच्छा
प्रतिभावंत कवी , निवेदक,व्याख्याते श्री.भगवान विशे सर यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांनाच हा काव्य संग्रह प्रकाशित केला. अत्यंत कमी वयात कवितेची समज आणि प्रतिभा असलेले माझे मित्र विशे सरांना पुढील लेखन कार्यासाठी खूप शुभेच्छा!
ReplyDeleteसमिक्षा खूप सुंदर केली आहे.....
खुप छान असा कविता संग्रह आहे . आमचे मित्र प्रतिभावंत कवी, निवेदक, व्याख्याते श्री . भगवान विशे सर यांनी कवितेतून व्यक्त केलेल्या भावना वाचकाच्या अंतर मनाला स्पर्श करून जातात . सरांना पुढील लेखन कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा
ReplyDeleteभगवान विशे सर आपल्या शहापूर तालुका, ठाणे जिल्हा, महाराष्ट्राचा मान अभिमान सन्मान आहेत.
ReplyDeleteKeep it up brother
खूप छान (सर)
ReplyDeleteKhup chan kavita ahet Bhagwan sir
ReplyDelete