वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता- सौ अंजली शशिकांत गोडसे शिर्के मर्ढे सातारा
पुस्तक परिचय क्रमांक-२७
पुस्तकाचे नांव- विचारवेध
लेखकाचे नांव- राजेंद्र बोबडे
प्रकाशन व आवृत्ती- ग्राममित्र प्रकाशन , कराड २०२१ प्रथम आवृत्ती
पृष्ठे संख्या– १११
किंमत /स्वागत मूल्य-- २१०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२ ७||पुस्तक परिचय
विचारवेध
लेखक - राजेंद्र बोबडे
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
प्रयत्नवादी माणसं यशाकडे आणि अपयशाकडेही दुर्लक्ष करतात . यश आले तर आनंदाने स्वीकारायचे . अपयश आले तर परत जोमाने कामाला लागायचे . हीच त्यांची प्रवृत्ती बनलेली असते .
हा सुंदर विचार राजेंद्र बोबडे लिखित विचारवेध या पुस्तकातील आहे .खरोखर शालेय जीवनात तर हे सुविचार मुलं घडवत असतात , विद्यार्थी घडवत असतात आणि पालक घडवत असतात .
असे सुंदर सुंदर विचार आपल्या पुस्तकात आदरणीय राजेंद्र बोबडे सर यांनी स्वतः लिहिले आहेत. प्रत्येक विचार नवी प्रेरणा, नवी कल्पना ,नवी उर्मी आणि नवीन आशा दाखवणारा आहे. बोबडे सर मोठे लेखक आहेत. त्यांची समाजाला मार्गदर्शक अशी प्रेरणा देणारी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातीलच हे एक विचारवेध पुस्तक. त्यांच्याकडूनच हे पुस्तक मला भेट मिळालेले आहे. अनेक विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवर, विविध मान्यवर व्यक्तींसाठी त्यांच्या हातून मान्यपत्रही लिहिली गेली आहेत. दररोज काहीतरी लिहिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. पण ते काहीतरी लिहिणे म्हणजेच समाजातील वैचारिकतेला वाव देणारे आहे.
तुम्हीही विचारवेध पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
विचारवेध हे पुस्तक ग्राममित्र प्रकाशन कराड जिल्हा सातारा यांनी प्रकाशित केलेले आहे . राजेंद्र बोबडे सरांनी हे पुस्तक त्यांची पुतणी मेघा यांच्यासाठी अर्पण केलेले आहे .
नातं कसं असावं तर पाण्यासारखे निर्मळ . नातं कसं असावं तर आरशासारखं स्वच्छ कसेही पहा कसे ही तपासा तरी एक सारखेच दिसणारे आपले मूळ रूप कधीही न बदलणारे . !
सुंदर, निरपेक्ष , निस्वार्थ आणि निर्मळ असे विचार या पुस्तकात आदरणीय बोबडे सरांनी मांडलेले आहेत . नक्कीच तुम्हा सर्वांना विचारवेध हे पुस्तक आवडेल . यातील विचार वाचताना आपल्या मनात नक्कीच हे विचार उतरतील . आपल्यातील जी जीवनाकडे पाहण्याची वृत्ती आहे ती नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही .
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय बोबडे सर या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारा संपूर्ण निधी समाजातील अनाथ, दिव्यांग गरजूंसाठी वापरणार आहेत .म्हणजे या पुस्तकाच्या शब्दातून तुम्हाला ते मौलिक विचार देणार आहेतच पण या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणाऱ्या आर्थिक लाभातून ते कुणाच्यातरी घराचा आधार बनणार आहेत . त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा असेच सुंदर सुंदर मौलिक लेखन करत रहा आणि आम्हा वाचक रसिकांना ते वाचावयास देत रहा याच शुभेच्छा .
शेवटी एवढेच म्हणेन मी, बोबडे सर आपल्या पुस्तकात म्हणतात चांगल्या विचारांना निरोप हा कधीही देता येत नाही कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या जीवनात पुन्हा पुन्हा परतत असतात . !
सौ . अंजली शशिकांत गोडसे शिर्के
मर्ढे सातारा


No comments:
Post a Comment